savitalote2021@bolgger.com

काव्यसंग्रह मराठी कविता बाबासाहेबांच्या कविता दलित साहित्य आणि कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काव्यसंग्रह मराठी कविता बाबासाहेबांच्या कविता दलित साहित्य आणि कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

दीक्षा (काव्यसंग्रह) "एक आरंभ नव युगाचा" Deeksha " A beginning of the New Age"

दीक्षा (काव्यसंग्रह) 
          "एक आरंभ नव युगाचा"

 Deeksha 
" A beginning of the New Age"


  काव्यसंग्रह शीर्षक :-  दीक्षा 
          "एक आरंभ नव युगाचा"
✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे 

            आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

--------------------------------------------------------------------------

*** प्रस्तावना ***
         " Preface "



काव्य / कविता हे विशिष्ट एका भावनेवर आधारित असते. भावसंवेदनेवर आधारित असते. कविता विचारसरणीवर आजूबाजूच्या परिस्थितीवर आधारित असते. आजूबाजूच्या परिस्थितीचा कवितेवर काव्यावर परिणाम होतो. हे नक्की.!!
" दीक्षा", एक आरंभ नवयुगाचा...!! हा काव्यसंग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक संरचनेमध्ये जी धम्मक्रांती घडवून आणली त्या दीक्षांत समारंभावर आधारित आहे.

( "Diksha", a beginning of the New Age...!!  This anthology is based on the convocation ceremony of Dr. Babasaheb Ambedkar which brought about a revolution in the social structure.)

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," धर्मांतराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे.1. सामाजिक दृष्टीने 2. धार्मिक दृष्टीने विचार केला पाहिजे. तसाच तात्विक दृष्टीनेही विचार केला पाहिजे. पुढे म्हणतात धर्मांतर हा काही मौजेचा विषय नव्हे हा माणसाच्या जीविताचा प्रश्न आहे."

( Dr.  Babasaheb Ambedkar says, "Conversion should be considered from two perspectives. 1. From a social perspective. 2. From a religious perspective. Similarly, from a philosophical perspective, it should also be considered. Further, it is said that conversion is not a matter of fun, it is a question of human life." )

      काव्य ही कला नसून प्रतिभा आहे. ती जोपासावी लागते..... रुजवावी लागते ....नवनवीन शब्दासोबत.... नवनवीन पद्धतीने.... नवनवीन विषय घेऊन .....मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मनाला उत्तेजन मिळते. शक्ती मिळते. आत्म स्वाभिमान मिळतो.अभिमान मान - सन्मान यापेक्षा ही अलौकिक प्रफुल्लित आनंद मिळतो. सर्जनशील  शक्तीला नवीन उगम मिळतो. नवीन दिशा मिळते. नवीन शब्दांशी नवीन ओळखी होतात.

( "Poetry is not an art but a talent.  It has to be cultivated..... it has to be rooted.... with new words.... in a new way.... with new topics....attempts are made.  It stimulates the mind.  Power is gained.  Self-esteem is gained. This supernatural happiness is more than pride.  Creative power finds a new source.  Gets a new direction.  New acquaintances with new words".)

     कवितेमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शिक्षण अशा विविध विषयावर लिहिले जाते. कविता हे विश्व फार व्यापक आहे. या विश्वात एखाद्या तरी मोती आपल्याला मिळावा इतकीच अपेक्षा शब्द लिहिताना असते. काव्य- कविता शब्दात मांडताना नेहमी लक्षात ठेवावे लागते. शब्द हे तलवारी सारखे आहे. लेखणी सोबत आल्यास एक नवीन इतिहास घडवू शकतो.लेखणी आणि शब्द हा इतिहास लिहीत असतो.आज लिहिलेल्या शब्द उद्याचा इतिहास होतो हे नेहमी लक्षात ठेवून कवितेची निर्मिती करावी लागते.

( Poetry is written on various topics such as social, political, economic, religious, education.  The universe of poetry is very wide.  While writing words, we only hope to find some pearl in this world.  Kavya- Poetry should always be kept in mind while putting it into words.  "Words are like swords". 💕 A new history can be created if the pen comes along. The pen and words are writing the history. One has to create poetry always keeping in mind that the words written today become the history of tomorrow.)

काव्य /कविता लेखन निर्मिती हे वाचकांसाठीच असते. रसिक माय बापाच्या आशीर्वादामुळे लेखणी कागदावर उतरवली जाते. काव्य प्रोत्साहित करीत असते. नवीन यशस्वी काव्य लिहिण्यासाठी  प्रेरणा देत असते. वाचक रसिक प्रेक्षक हे आमचे मायबाप आहे. आम्ही आमचे विचार काव्याच्या स्वरूपात संग्रहित करीत असतो काव्यसंग्रहाच्या निमित्ताने पण खरी शक्ती तुमच्या विचारांची असते.तुम्ही दिलेल्या प्रेरणा असते. त्यामुळे आम्ही उत्तम उत्तम लिहिण्याचा प्रयत्न करीत असतो. 

( Poem/poetry writing creation is for readers only.  Thanks to the blessings of Rasik My Bapa, pen is put to paper.  Poetry encourages.  New success inspires to write poetry.  Readers are our parents.  We are collecting our thoughts in the form of poetry for the purpose of poetry collection but the real power is your thoughts. The inspiration you give.  So we try to write the best. )

  शब्दाना एका विशिष्ट कवितेमध्ये आणि काव्यसंग्रहात संग्रहित करताना सुद्धा खूपदा गणिते शब्दांचे चुकतात तरी शब्द प्रेरणा देत असतात आणि नवीन कवितेच्या स्वरूपात ते कागदावर उमटतात नवीन प्रतिभेने...!💕🌹            नवीन शब्दरूपी माळेमध्ये गुंफण्यासाठी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शब्द अलौकिक स्वरूपात आपल्याकडून लिहिले जाते. लेखक समाजाच्या भावभावनांना आशा - आकांक्षांना सुखदुःखांना शब्दरूप देत असतो.

     कधीकधी विशिष्ट विचारधारेवर कविता लिहिताना त्या विचारधारेचा अभ्यास असावा लागतो आणि तो अभ्यास खऱ्या अर्थाने त्या काव्यसंग्रहाला जिवंतपणा देत असते.

दिशा एक आरंभ नवयुगाचा हा काव्यसंग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे धम्म क्रांती घडवून आणली आणि संपूर्ण अस्पृश्य समाजाला बौद्ध केले माणसाला माणूस म्हणून जगण्याचा नवीन मार्ग दिला या विचारधारेवर आधारित आहे हा काव्यसंग्रह ऑनलाइन प्रकाशित करीत आहे बाबासाहेब यांचे विचार स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व यावर आधारित आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार मिळावे म्हणून बाबासाहेबांनी आयुष्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आहे त्यांच्या यशोगाथाच्या वटवृक्षाला सुगंधित फळाफुलांनी बहरलेला आहे आणि ते फळे आम्ही आता चाखत आहो तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांचे नाव आहे र हे वाक्य खरच मनाला स्पर्शून जाते कारण त्यांचे ऋण कधीही फिटणार आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो धम्म मार्ग दिला मध्यम मार्ग दिला तो मार्ग जीवनाला प्रकाशमय करणार आहे स्वतः उपाशी राहून बाबासाहेबांनी संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी झिजत राहिले त्यांचे विचार अंधारात उजेडाला प्रकाश देणारे आहे जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे बाबासाहेब ते वर्गाच्या बाहेर बसून शिकले आणि समाज व्यवस्थेची संरचना संपूर्ण संकल्पना बदलून टाकले आणि शेवटचा एकच उपाय त्यांना दिसला तो म्हणजे धम्म परिवर्तन याच विचारधारेवर याच प्रगतीच्या दिशेच्या वाटचालीवर हा काव्यसंग्रह काव्यसंग्रह थोडा आजच्या विचारधारेवर आधारित आहे आजच्या परिस्थितीवर आधारित आहे धम्मक्रांतीच्या वेळी असलेली परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये जमीनासमांचा फरक आहे हरवलेली वाट आणि सापडलेली वाट यामध्ये जितके अंतर आहे तितकेच अंतर या काव्यसंग्रहामध्ये आहेत
बाबासाहेबांच्या सकारात्मक विचारसरणीवर आज समाज विकास प्रवाह आपला प्रवास ध्येयापर्यंत पोहोचत आहे काव्यसंग्रह त्याच त्या प्रवासाच्या त्या त्यांच्या त्या संघर्षाला त्यांच्या त्या जाणिवेला शब्दात थोडाफार व्यक्त करण्याचा प्रयत्न चुकलास माफी असावी कारण मी फक्त त्यांचे विचार त्यांचे कार्य काव्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करीत आहे बाबासाहेबांनीफफ़ अत्त  दीप भव स्वयंप्रकाशित व्हा या विचारांमधून मांडलेला आहे  भारतीय शोषितांच्या दुःखाचे कारण आर्थिक शोषणापेक्षा अज्ञानात अधिक आहे आणि अज्ञानाला जन्म देणारा अस्पृश्य अस्पृश्यतेवर आधारित समाजाची रचना होय या समाजातील संरचनेला मोडीत काढण्यासाठी समाजामध्ये समता प्रस्थापित करणे खूप महत्त्वाचे आहे मनुस्मृतीचा धिक्कार करून स्वातंत्र क्षमता बंधुत्वावर आधारित विचारसरणी आपल्या अनुयायांच्या विकास प्रवाहासाठी महत्त्वाची आहे असे बाबासाहेबांना वाटत होते आणि त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे घेतली आणि भारतीय समाज बौद्ध धर्म हा जनसामान्याच्या जगण्याचा नवीन मार्ग मिळाला विवेकी स्वावलंबी स्वाभिमानी समाजभिमुख समाज रचना त्यांच्या जीवनशैलीचा भाग झाले अस्पृश्य आणि शूद्रता यामुळे त्यांना मिळालेली वागणूक बौद्ध धम्मामुळे आणि शैक्षणिक वारसा मुळे विज्ञानवादी समाज रचनेकडे शून्य व जीवनशैली आता गतीमान झाली. प्रकाशमय झाली . हेच विचार हाच आग्रह बाबासाहेबांचा आपल्या समाजातील विकासासाठी होता. नवसमाज व्यवस्थेच्या रचने शिक्षणासोबतच धम्म ही आपल्याला उपयोगी पडेल त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल असे त्यांना वाटत होते विशेष म्हणजे धम्माने आपल्याला नवीन दारे धार्मिक दृष्ट खुली तर करून दिले पण आपण आपली महत्त्वाची भूमिका ठामपणे या समाज रचनेसमोर मांडत राहिलो पुढारलेल्या जातीसामोर स्पर्धेच्या एकही मोकळ्या जागा आपण ठेवला नाही. आपण स्पर्धेत खुला मनाने उतरलो आणि शैक्षणिक सवलतीच्या आणि आरक्षणाच्या संधीमुळे मोठमोठ्या गोष्टी आपण साध्य करू शकलो आणि हे सर्व आपल्याला नवीन समाज रचनेमुळे मिळाली आणि ही समाज रचना बाबासाहेबांनी दीक्षा समारंभामध्ये आपल्याला दिली नवीन आरंभ जीवनाचा चालू झाला. जीवनशैली वाहत्या पाण्यासारखी असावी असे बाबासाहेबांना वाटत होते. विकासाचे सर्वेद्वारे सर्वांसाठी खुले असावे असे वारंवार त्यांच्या भाषणांमधून आपल्यापर्यंत येतात. डबके साचले की अस्पृश्यता निर्माण होते हे वारंवार बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले आहे.म्हणून खुल्या आचार विचाराचा धम्म आपल्यापर्यंत बाबासाहेबांनी पोहोचवला त्याला कुणालाही आग्रह केला नाही त्यांनी त्यांची भीष्मप्रतिज्ञा पूर्ण करून दाखविणे आणि आपल्यासारख्या वंचित अस्पृश्य शूद्र वंचित पाणी नसलेल्या विहिरीला धम्मात परिवर्तित केले आणि आयुष्याचा एक संघर्ष संपविला माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष संपलेला पाण्याचा हक्क मिळाला जगण्याचा हक्क मिळाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला विशेष मध्ये आपण नैसर्गिक रित्या माणूस झालो सृष्टीच्या कणाकणा निसर्गाने दिलेल्या सर्व सुख सुविधा आपल्यापर्यंत आल्या तो निर्मळ झरा धम्माचा बाबासाहेबांनी आपल्या वाटेला दिला म्हणून आजचे हे जीवन दीक्षा एक आरंभ नवयुगाचा हा काव्यसंग्रह तयार करताना मनामध्ये एकच गोष्ट सतत येत होती ते म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला कोणत्याही धर्माविरुद्ध जाण्यासाठी प्रेरित केले नाही तर बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेला नष्ट करण्यासाठी आपल्याला बौद्ध धम्म दिला. दगडी जमिनीमध्ये एक रोपटे लावून गेले आणि आता ते फळाफुलांना आणि सुगंधित चोहीकडे दरवळत आहे. विकासाच्या महाप्रवाहात एक प्रवास चालू झाला आहे.  सामाजिक परिस्थिती बदलली कोणी ही तरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे पण ते आता बदलू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी सामाजिक संरचनाच बदलून टाकली आहे. संविधानामुळे जळत्या घराची आता आग शांत झाली आहे. यात्रा आता जीवनाची थोडी सुखमय झाली आहे. म्हणून हे पावले नेहमी बाबासाहेबांच्या दिशेने जातात बाबासाहेबांच्या विचाराचे पायवाट जिथे जिथे दिसेल तिथे जातात. बाबासाहेबांचे विचार जगण्यासाठी आणि संघर्षासाठी नेहमी तयार करणारे आहे.गोपनीयता इथे काहीच नाही मुक वेदना विद्रोहात परिवर्तित झाले आहे आणि आता विद्रोह विकासाच्या प्रवाहामध्ये स्पर्धेमध्ये कुठेतरी मागे पडतो आहे पण बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली धम्मक्रांती त्यांनी दिलेली दीक्षा हे कधीही मागे पडणार नाही चळवळ अजूनही चालूच आहे. बाबासाहेबांनी दिलेली थोडी शांत झाल्यासारखे वाटते पण बाबासाहेबांची विचार ज्या ज्या पावलांनी आम्हाला दिसते त्या त्या पडते आम्ही ठामपणे जात आहोत कारण बाबासाहेबांनी जे आम्हाला दिले ते इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिले आहे इतिहास साक्षी आहे. आमच्या अस्पृश्यतेच्या गाव कुशाबाहेर जगण्याच्या जीवन शैली सोबत इतिहास साक्षी आहे.
      धम्मक्रांती साठी कारणांसाठी इतिहास साक्षी आहे. वर्गाबाहेर शिकणाऱ्या न कळत्या वयात अस्पृश्यतेचे चटके सहन केलेल्या त्या जीवनाशी म्हणून आम्हाला आता त्याचे दुःख वाटत नाही. बदललेली भाषा आमची आहे पण ती भाषा देण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे. दिशा आहे पण प्रकाशाची वाट सोनेरी आहे. प्रवाह दुःखाचा होता आता धम्माच आहे. मानवतेचे गाणे आम्ही जात आहोत. जरा परिवर्तनाचा आता आनंदात परावर्तित झाला आहे कारण धम्मक्रांती दीक्षाभूमीची आनंदाचा उत्सव आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आनंदाचा उत्सव म्हणजे दीक्षा समारंभ. 
       दीक्षाभूमी नागपूरच्या दीक्षाभूमीवर ज्याप्रमाणे ऐतिहासिक समारोह साजरा केला जातो. संपूर्ण जगात हा उत्सव साजरा केला जातो. त्याची साक्षीदार मी आहे आमच्या चार पिढ्या त्या दीक्षा समारंभाचे साक्षीदार आहे. वाहत्या पाण्यासारखे आम्ही बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित आहोत. समता, स्वतंत्र, बंधुत्व,न्याय या तत्त्वावर बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा मार्ग दिला. आता आम्ही जन्माने बौद्ध विचाराने बाबासाहेबांचे अनुयायी आहो. दीक्षाभूमीची पायवाट मोकळी आहे. नव आरंभ जगण्याचा आम्हाला धर्मांतरामुळे मिळाला  आणि या धम्माला आम्ही आमचे जीवन समर्पित केले आहे.

         काव्यसंग्रह याच विचारधारेवर आधारित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चुका आढळते ते मनाला लावून घेऊ नका कारण विचारधारास माणसाला माणूस बनविणाऱ्या माणसाची आहे आणि त्या विचारधारेला काव्य स्वरूपात मांडणे ही एक कठीण गोष्ट आहे. सोपी काहीच नाही आणि कोणतीच गोष्ट सोपी नसते हे मनात ठेवून या विचारधारेवर प्रथमच काव्याची निर्मिती करीत आहे.
      काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल. "दीक्षा, एक आरंभ नव युगाचा" हा काव्यसंग्रह विशिष्ट उद्देशाने लिहिला गेलेला आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित हा काव्यसंग्रह आहे. रमाई यांच्यासाठी नवीन पंढरपूर तयार केले आणि ते पंढरपुर आता आमचे श्रद्धास्थान झालेले आहे. विचारांची दिशा तिथूनच चालू होते आणि तिथे संपते...! म्हणून एकदा तरी आयुष्यात नागपूरची दीक्षाभूमी बघा ..... ते विचार ती मानवता समता न्याय बंधुत्व आणि धम्मा प्रति असलेली न्यायनिष्ठा जगण्याला नवीन अर्थ देते. त्याच अर्थाला शब्दबद्ध करण्याचे माझा छोटासा प्रयत्न. याच भावविश्वातून हा काव्यसंग्रह तयार झाल्या,
" दीक्षा, एक आरंभ नवयुगाचा"...!❤



--------------------------------------------------------------------------

*** दोन शब्द काव्यसंग्रहाबद्दल ***

दीक्षा एक आरंभ नव युगाचा हा काव्यसंग्रह डॉक्टर बाबासाहेब यांच्या धम्मक्रांतीवर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर वंचित बहुजन अस्पृश्य समाज आजही अस्पृश्यच असतात समता  न्याय बंधुत्व स्वातंत्र्य शिक्षण सुरक्षितता यासारखे कितीतरी शब्द वाटेला आले नसते.

( Diksha Ek Arambh This poetry collection of Nav Yuga is based on Dhammakranti of Doctor Babasaheb.  Dr.  If it was not for Babasaheb Ambedkar, many words like equality, justice, fraternity, freedom, education, security would not have come into existence.)
        

        आजही आपल्याला दलिता शब्द वापरला जातो. वंचित समाज हा शब्द वापरला जातो. हे शब्द का वापरले जातात माहित नाही आज अस्पृश्य समाज  त्या सर्व पदांवर जाऊन पोहोचलेला आहे, तिथे जाणे स्वप्नातील विचार केला नव्हता पण आपण आरक्षणामुळे तिथे आहो .....,असा भ्रम समाजामध्ये पसरविला जात आहे. स्पर्धा युगाच्या या जगात मेहनतीला तितके मोल आहे, जो या स्पर्धेत टिकेल तो टिकेल अशी आजची स्थिती आहे.

 ( Even today we use the word dalit.  The term deprived society is used.  I don't know why these words are used, today untouchable society has reached all those positions, it was not a dream thought to go there but we are there because of reservation..., the illusion is being spread in the society.  In today's competitive world where hard work is valued as much as it is, whoever survives this competition survives.)

        बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण सोबत बौद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण कितीही खुल्या वातावरणात जगत असलो तरी आजची प्रगती साध्य करणे हे एक इतिहास झाला असता पण बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आपल्याला धम्मक्रांती दिली. दीक्षा दिली आणि हा एक नवीन इतिहास समाजापुढे त्यांनी लिहून ठेवलेला. त्यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. "मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही.......", सत्यात उतरविले आहे.

( If Babasaheb had not given us Buddhist Dhamma along with reservation, no matter how much we live in an open environment today, achieving today's progress would have become a history, but due to Babasaheb's vision, he gave us Dhamma revolution.  He initiated and wrote a new history before the society.  He has fulfilled his promise.  "I was born in Hinduism but will not die in Hinduism...", has come true.)


       काव्यसंग्रह याच विचारावर आधारित आहे. परिस्थिती बदलली आहे. विकास बदलला आहे. विचारांच्या प्रवाह बदलला आहे .जगण्याचा मार्ग बदलला आहे. जीवनशैली बदलली आहे पण गाव कूशाबाहेरील जगण्याचे चटके अजूनही मनाला तितक्याच वेदना देऊन जातात.
        आपण गौरव गाथा गाताना त्या मडक्या झाडूची वेदना कुठेच कमी होत नाही. आजची परिस्थिती शिक्षित आहे तरी त्या वेदना कुणालाही कमी करता येऊ शकत नाही. इतिहास साक्षी आहे.... त्या अवहेलनेला त्या जीवघेण्या परिस्थितीला आणि बौद्ध धम्मामुळे आम्ही माणसात आलो. नवीन अध्यात्मिक मार्ग आम्हाला मिळाला आणि आमचा कितीतरी वेळ रुढी प्रथा परंपरा यांच्या मागे जाऊ शकला असता तो वेळ धम्मामुळे आम्हाला वाचवताना आला. 

( The anthology is based on this idea.  The situation has changed.  Development has changed.  The flow of thought has changed.The way of life has changed.  Lifestyles have changed but the pains of living outside the village are still painful.
          As we sing Gaurav Gatha, the pain of that pot broom does not diminish anywhere.  Today's situation is educated but no one can reduce that pain.  History bears witness.... to that defiance to that life-threatening situation and to the Buddhist Dhamma we became human.  A new spiritual path was found for us and we could have spent a lot of time following traditional practices, but the Dhamma came to our rescue. )

       तोच वेळ आम्ही आमच्या विकासासाठी खर्च केला आहे. आजच्या स्पर्धा युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त शिक्षणाची गरज आहे मेहनतीची गरज आहे. योग्य दिशेची गरज आहे आणि ती योग्य दिशा बाबासाहेबांनी आम्हाला दिली आहे. काव्यसंग्रहात मुके शब्द आता बोलते झाले आहे, सारा हिशोब आता चुकता झाला आहे, इतिहासाचे पाने जातीव्यवस्थेचे गळून पडले आहे, एक आरंभ नवयुगाच्या हा मुळे असे शब्द येतात. आता मी रूढी प्रथा परंपरेचे मातीचे ढिगारे  उचलत नाही. आम्ही विज्ञानाची शिक्षणाच्या रंगमंचावर मोकळा शब्दांसोबत चालतो आहे.

( That is the time we have spent on our development.  In today's competitive age, only education is needed to prove oneself and hard work is needed.  Right direction is needed and Babasaheb has given us that right direction.  In the anthology, mute words are now spoken, all calculations are now wrong, the pages of history have fallen from the caste system, a beginning of the new era comes from the roots of these words.  Now I don't pick up the dirt mounds of customary tradition.  We walk the stage of science education with free words. )


     मानवतेचा रणसिंग फुंकला आहे असे शब्द येतात. नवीन पहाट धम्मक्रांतीची दीक्षाभूमीवर आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळाली आहे. आम्हाला आमचा हक्काचा मंच मिळालेला आहे. अशा शब्दात कवितेची निर्मिती करण्याचा थोडाफार प्रयत्न.
      प्रवाहाची दिशा बदललेली आहे असाभ्रम समाजचा मध्ये पसरविण्याचा प्रयत्न होतो आहे पण आम्ही असुरक्षितेचे चटके विसरलो नाही. आम्ही नवीन प्रवाहासोबत जाऊ शकत नाही कारण "आमचा नवीन प्रवाह म्हणजे धम्म आहे" आमचे शिक्षण आहे...  विज्ञान आहे. जगण्याच्या नवीन दिशा आहे. आम्ही मानवतेचे गीत गाता आहो अशा शब्दात काव्यसंग्रहातील कविता लिहिण्याचा हा प्रयत्न.

( The society is trying to spread the illusion that the direction of the flow has changed, but we have not forgotten the insecurity.  We cannot go with the new stream because "our new stream is Dhamma" our education is...  science.  There is a new way of living.  This is an attempt to write a poem in an anthology in the words that we are singing the song of humanity. )

   अनाथाचा नाथ म्हणजेच बाबासाहेब. वेदनेवर हळूच फुंकर म्हणजे बाबासाहेबांचे विचार. एक नवा प्रकाश मार्ग त्यांनी दिला. शोषित पीडित वंचित तळागाळातील माणसाच्या वेदनांना न्याय हक्क मिळवून दिला. वैचारिक दृष्टिकोन सांगणारे ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी.
      अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीवर भीम सागराला उधान येते दरवर्षी धम्म महोत्सव सांस्कृतिक आयोजनातून बाबासाहेबांच्या क्रांतिदर्शी विचारांचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा जल्लोष दीक्षाभूमीवर होतो. ही दीक्षाभूमी असंख्य लोकांची बोलकी कविता झालेली आहे. बोलके काव्य आहे. असंख्य लोकांची जगण्याची जीवनशैली झालेली आहे.
  माणसाच्या प्रगतीची साक्षरता दीक्षाभूमी आहे. धम्मचक्र परिवर्तनाचा संदेश देणारा स्तूप आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखोंच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा या कवितेचा गाभा आहे. नवीन शब्दांच्या साक्षीने अवर्णनीय अशा सोहळ्याला  शब्दात उतरवण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न आहे. विजलेल्या दिवाना पेटविणारा थडग्यांना जागविणारे बाबासाहेबांचे विचार आहे. उजेडाची वारसदार ही कविता आहे. उजेडाच्या विचारांचा नवीन तेज म्हणजे कविता बाबासाहेबांची आहे. 

 (Literacy is the initiation ground of human progress.  Dhammachakra is a stupa that conveys the message of transformation.  The core of this poem is that he was initiated into Buddhism on 14 October 1956 in the presence of millions.  There is a war level effort to put into words such an indescribable ceremony with the witness of new words.  Babasaheb's thought is the one who lights the burnt lamp and awakens the graves.  Heir to light is a poem.  The new brilliance of Ujeda's thoughts is the poetry of Babasaheb. )


      अस्पृश्यता मुक्तीच्या लढ्याची साक्षीदार दीक्षाभूमी आहे. दीक्षा एक आरंभ नव युगाचा म्हणजेच गतीचे चक्र फिरविणाऱ्या माणसाला ही भाव वंदना हे स्वातंत्र्याची बंधुत्वाची समतेची न्यायाची ही फुले मी त्यांना समर्पित करीत आहे. समजेल रुचेल पटेल या शब्दात ही फुले मी माझ्या वाचकांसाठी मांडत आहे.
          कधीतरी शांत बसावे असे वाटते पण विचारांचा गोंगाट शांत बसू देत नाही. बाबासाहेबांनी दिलेले विचार शब्दबद्ध करण्यासाठी बाबासाहेबांचेच विचार शक्ती व  प्रकाश देतात. जबाबदारीने वागण्याची नवीन दिशा देतात. रोज स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवनवीन मार्ग देतात.

(Sometimes you want to sit still, but the noise of thoughts does not allow you to sit still.  Babasaheb's thoughts give power and light to articulate the thoughts given by Babasaheb.  Gives a new direction to act responsibly.  Everyday offers new ways to prove yourself.)

       उगवणारी प्रत्येक सकाळ एक नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असते आणि विशिष्ट विचारधारेवर आधारित कविता प्रत्येक क्षणाला नवीन जन्म देत असते. नवीन काहीतरी लिहिण्यासाठी ती सर्जन शक्ती आपल्याला मदत करत असते आणि त्या सर्जनशक्तीच्या व नवनिर्मितीच्या शक्तीच्या जोरावर मला समजेल पटेल माझ्या बालबुद्धीला रुचेल  अशा शब्दात मी त्या भावना लिहिण्याचा प्रयत्न करते.
       माझे प्रत्येक शब्द हे बाबासाहेबांना समर्पित आहे. बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या त्या प्रत्येक खडतड प्रवासाला समर्पित आहे. त्या संघर्षाचे साक्षीदार म्हणून मी माझे शब्द लिहीत राहणार आहे आणि तुमच्या समोर मांडत राहणार आहे.         चुका होतील अनुभव शून्य व्यक्तीच्या हा एक अनुभव शून्य काव्यसंग्रह आहे, असे समजून चुकांकडे दुर्लक्ष करा आणि त्या मला सांगा सुद्धा....!😀 काव्यसंग्रह आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

(...... Diksha Ek Aramb Nav Yugacha," This collection of poems is dedicated to the same jubilation, cultural festival, initiation festival. Babasaheb took the first step on the initiation ground and completely changed the structure of the social system. Man has got all the rights to live as a human being naturally, so this competition today.  ..!💕
        Today's age.....today's living...!!  So once you come to Nagpur's Dikshabhoomi and see how the Buddha's Dhamma is pure, the people of today's changed Dhamma culture will know.  No matter what ideology the people of the society follow, Babasaheb's thoughts are firmly rooted in their minds and brains.  So the movement will never end.   Will keep calm and do my job.  It seems that the revolt is over but the light of light has reached every household because Babasaheb has given Diksha Ek Arambam Nav Yugach at the last moment. )

      " ...... दीक्षा एक आरंभ नव युगाचा,"  हा कवितासंग्रह त्याच जल्लोषाला सांस्कृतिक महोत्सवाला दीक्षा महोत्सवाला समर्पित आहे. बाबासाहेबांनी पहिलं पाऊल दीक्षाभूमीवर टाकले व समाजव्यवस्थेची सहरचना संपूर्णपणे बदलून केली.  माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार नैसर्गिक रित्या  मिळाले म्हणून आजची ही स्पर्धा ...!💕
      आजचे हे युग .....आजचे हे जगणे...!! म्हणून एकदा नागपूरच्या दीक्षाभूमीला येऊन बघ धम्म बुद्धाचा कसा निर्मळ आहे हे आजच्या बदललेल्या धम्म संस्कृतीतील माणसांना माहीत होईल. समाजातील व्यक्ती कोणत्याही विचारधारेवर चालत असले तरी बाबासाहेबांचे विचार त्यांच्या मनात आणि मेंदूत घट्ट आपले घर करून आहे. म्हणून चळवळ कधीही संपणार नाही.  शांत राहून आपले काम करणार आहे. विद्रोह संपला आहे असे वाटते पण उजेडाचा प्रकाश हा प्रत्येक घराघरात पोहोचलेला आहे कारण दीक्षा एक आरंभ नव युगाच बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणाला दिलेला आहे.

--------------------------------------------------------------------------

****  अनुक्रमणिका ****

1.आनंद 
2. सुगंधित पाने 
3.प्रवाह 
4.बदललेले शब्द 
5.पेटून वनवा 
6.मेणबत्ती 
7.ताट प्रकाशाचे 
8.मांडला नवा डाव 
9.समर्पण 
10.प्रभात 
11.आरसा 
12.माझ्या वेलीवर 
13.समानता 
14.बापमाणूस 
15.दुःख 
16.सूर्य
17. माणूसपण 
18. मातीच्या गर्भात 
19. तू विसरु नको माणसा 
20. जयंती 
21.नवज्योत 
22. आंबेडकरवाद 
23. महामानवता 
24. नवीन पायवाट 
25. समानतेच्या जंगलासाठी 
26. स्वरूप बदललेले भाकरीची 
27. चालत राहते
28. सोहळा



--------------------------------------------------------------------------

**** Index ****

 1. Happiness 
 2. Fragrant leaves 
 3. Flow 
 4. Changed words 
 5. Burn the forest 
 6. Candles 
 7. Plate light 
 8. Mandala new innings 
 9. Surrender 
 10. Morning 
 11. Mirror 
 12. On my vine 
 13. Equality 
 14. Bapa Manoos 
 15. Sadness 
 16. Sun
17. Humanity
 18. In the womb of the soil
 19. Don't forget, man
 20. Jayanti
 21. Navjot
 22. Ambedkarism
 23. Great humanity
 24. New path
 25. For the forest of equality
 26. The shape of bread has changed
 27. It continues
 28. The ceremony


 

--------------------------------------------------------------------------


1.

      पिढीच्या गुलामगिरीची चौकट तोडल्यानंतर आम्ही धम्म स्वीकारला. बाबासाहेबांनी दिलेल्या नवीन मार्गसोबत चालत आहोत. कारण हा आनंद आम्हाला मिळाला पिढ्यांनी पिढ्या समाज व्यवस्थेच्या अस्पृश्यतेच्या चटक्यानंतर.         म्हणून आम्ही आता आनंदी राहत आहो  तो आनंद नवीन दिशेमुळे मिळाला. दीक्षामुळे मिळाला...!! ही कविता याच भावविश्वातून.                   आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल. धन्यवाद...!🤣💕

*** आनंद ***

मी माझ्यात आनंद नवीन 
शोधला आहे दीक्षाभूमीच्या रूपाने 
फुलांची कहाणी आता 
माझी वाटते सुगंधासारखी रात्रीचा 
चंद्र अमावस्येला माझाच वाटतो 
गुलामीची बेडी तोडली म्हणून

मी पेरले आहे नवीन नाव मनात 
सांभाळले आहे नवीन नाव मनात 
कारण त्यांनी मला स्त्री म्हणून 
आनंद दिला म्हणून 
मी स्त्री म्हणून स्वातंत्र्य झाले
आहे म्हणून 

खऱ्या अर्थाने हक्काच्या जागेवर 
जबाबदारीने  
डोळ्यातला समानतेच्या भावनेवर 
जगण्याची नवीन वाट 
आनंदाने स्वीकारले गावकूशाबाहेरील 
अनुभवाच्या चटकांनी 
म्हणून मी उदास खिन्न राहत नाही 
हसऱ्या चेहऱ्यांनी
दीक्षा नवीन आरंभामुळे...!💕😀

✍️ ©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. 
     शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
        आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

2.
          बाबासाहेबांच्या कष्टाचा लढायच आणि घामाचा सारा हिशोब आता चुकता केला जात आहे. जीवन जे बाबासाहेबांनी आम्हाला दिले त्या वाटेवर चालून आम्ही आमच्या आयुष्य सुगंधित करिता याच भावविश्वातून ही कविता.

       कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावर संशोधन केले जाईल. धन्यवाद...!💕


**** सुगंधित पाने ****

सारा हिशोब आता 
चुकता होत आहे 
जळलेल्या जातिव्यवस्थेवर 
इतिहासाचे पाने खुले 
होत आहे मोकळा श्वास घेण्यासाठी 
अजून वादळे शांत झाली नाही 
तरी मनाच्या गाभाऱ्यात असीम 
शांतता नांदत आहे 

प्रगतीच्या टप्प्याटप्प्यावर 
अनेक वादळांना 
शांत करीत 
जागृता ही दीक्षेची
मनात आसवांचा प्रत्येक 
अश्रूंच्या आता 
हिशोब घेतला जात आहे 

विज्ञानाचा शिक्षणाचा 
उपयोग मानव म्हणून होण्यासाठी 
केला जात आहे 
मोकळा शाळेच्या भिंती आमच्या आहे 
मंदिराच्या नसल्या तरी 
दीक्षाभूमीची पायवाट मोकळी आहे 
समाजातील वंचित गुलामांना 

तिथे विचारले जात नाही जात 
कोणतीही जात 
तिथे फक्त 
माणूस तितका महत्त्वाचा 
महाभारत लिहून काही साध्य होत नाही त्यासाठी संविधान लिहावे लागते 
खुल्या नयनांनी 

जखमांचा हिशोब 
आता पूर्ण होत आहे 
अत्त दीप भव या महामंत्राने 
स्वय:दीप होण्यासाठी 
नव्या जाणिवेचा 
नव्या मानवतेचा 
नव्या प्रगतीचा
नवीन आठवणींच्या सुगंधाचा....!!💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
3.

            बाबासाहेबांनी जी दिशा दिली ती अभिमानाने आम्ही असा सांभाळत आहोत. त्या दिशा मुळे वेळही बदलली आणि काळही बदलली. रात्रीची सकाळ झाली; हे सर्व दीक्षा मुळे झाले. आकाश ठेंगणे झाले. आयुष्य सांभाळताना याच पार्श्वभूमीवर ही कविता.               आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या दुरुस्त केला जातील.त्यावर संशोधन केल्या जाईल...!!💕🤣

*** प्रवाह ***

माझ्या प्रवाहाची दिशा कोवळी आहे 
प्रकाशाची दिशा खुली आहे 
म्हणून दुःखाची भाषा मी करत नाही 
प्रेमाचे गोडवे गात नाही 
बाबासाहेबांनी नवा धम्मा दिला 
म्हणून मानवतेचे गाणे गात फिरतो 

व्यथांच्या जखमांना मध्यम मार्गाचा 
मेकअप करीत 
भरलेली आहे जखम आता 
असे वाटते, तेव्हाच जखम परत 
नग्न होतात रक्तबंबाळ झालेल्या समाजव्यवस्थेकडे बघताना 

त्यांना सांगते आसवांचा 
उत्सव करू या 
मोकळ्या रानात 
ते मोकळ रान दिक्षेने दिले 
मनूच्या सत्यवादी वचनाला 
पायाखाली तुडवून 
मानवतेचा धम्म दिला 

विकासाच्या प्रवाहामध्ये 
नवीन दीक्षा आरंभ करून 
सारा हिशोब कसा 
कानामात्रासह .....
मानवतेचा करून ठेवला 
प्रवाहाच्या दिशेने 
नवीन आरंभ करून.....!!❤


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. 
     शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
        आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
4.
      इतिहासाची पाने साक्ष आहे समाज व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या इतिहासासोबत समाजातील एक मोठा भाग शब्दविना जगत होता. अत्याचाराला वाचाही नसणारा समाज आज दीक्षाभूमीमुळे आणि बौद्ध धम्मामुळे बोलता झाला आहे, त्याला आरक्षणाची एक नवीन बाजू भक्कम मिळाली आहे...!💕
       त्याच पार्श्वभूमीवर त्याच भावविश्वातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केल्या जाईल आणि दुरुस्त केल्या जातील.  धन्यवाद...!!💕🤣

 **** बदललेले शब्द ****

बदललेले शब्द कधी मुके होते 
रुतलेल्या व्यवस्थेवर जखमांची 
नव्हो जातीचे शब्द होते 
शोषित वंचित डोंगराला 
पाण्याची ही चव नव्हती 
स्वतंत्र झाडाच्या सावलीला 
फक्त प्रस्थापिताचा 
धर्म ....

म्हणून मातीचे ढिगारे उचलत नाही 
आता ,
शब्दांचे मुके आता 
बोलते झाले आहे
नव्या दीक्षा आरंभामुळे  

असाहय वेदना दाबून टाकत नाही 
हक्काचा आवाज चोहिकडे 
फिरवतो  आहे हक्काच्या मंचावरून 
मुक्या शब्दांना वाचा देत आहो 

अनिष्ट रूढींना पायदळी तुडवून 
विज्ञानाची मानवता फिरत आहोत 
मोकळा शब्दांसोबत
बदललेल्या शब्दांसोबत 
नवीन आरंभ जीवनाच्या रंगमंचाचा 
दीक्षा समारंभासोबत 
मानवतेचा रणसिंग फुंकत आहोत 
बदललेल्या शब्दांबरोबर 
बदललेला शब्दांसोबत... 💕😀🤣

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. 
     शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
        आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
5.
   जातीच्या नावाने भिंत उभा करणाऱ्या मानसिक ते विरुद्ध चीड निर्माण होत नाही तर आपल्या संघर्षाची कहाणी एक प्रियकर आपल्या प्रियसीबरोबर  बोलून दाखवत आहे. प्रगतीची वाट असताना कर्मकांड स्वतःभोवती गुंडाळून घेत आहे.
     स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी आहे पण तू त्याला वळण देत आहे ते वळण देऊ नको. हे सांगणारा एक प्रियकर.  त्या भावविश्वातून भाव संवेदनेतून ही कविता.
      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल.
 धन्यवाद..!💕

*** पेटवून वणवा ***

सखे, जातीयतेच्या नावाने 
ज्ञान पाजू नकोस 
तफावत आहे तुझ्या - माझ्या 
विचारांमध्ये कारण 
मी बुद्ध पेरला आहे 
माझ्या संस्कृतीमध्ये

तुझ देव - देव पण 
परंपरा संस्कृती रूढी सर्व 
तुझ्या आहे 
त्यात माझ काहीच नाही 
तुला वाटेल थोडेसे वाईट 
पण तुझ्या त्या विचारात 
भीम सूर्याचा उजेडच नाही 

सखे विद्रोहाची ठिणगी तुझ्यात आहे 
पण ती ठिणगी चुकीच्या मार्गाची  
स्वतःला बंधनात ठेवणारी  
सावित्रीने पेटवली शिक्षणाची 
ज्योत ओंजळी दिले 
प्रगतीचे दान 
पण तू विसरून गेलीस 
ते सर्व तू स्वतःचे पंख छाटत आहे 
प्रगतीचे दान असताना 
कर्मकांडाला गुंडाळून आणि ..?
मी नव्या युगाची नवी स्त्री आहे 
असा बोभाटा करत 
नवीन वनवा पेटवते आहे  
थोतांड..!

सखे ग्रंथ वाईट नाही 
अस्पृश्यता वाईट आहे 
लढाई पाण्यासाठी होती
जगण्यासाठी - हक्कासाठी  
बहुजनांच्या ज्ञानसूर्य प्रकाशमय होण्यासाठी  सखे लढाई हजारो लोकांना 
माणूस म्हणून जगण्याची होती 
रंजल्या गांजल्या बहुजनांना 

सखे, वंचितांना हक्काची 
शिदोरी मिळावी यासाठी होती 
मी पिढीजात जातीची भिंत ओलांडली आहे  
मी बुद्ध झालो आहे 
आरंभ माझा सर्व निसर्ग अधिकारांसोबत 
मी ही लढाई जिंकली आहे 
क्रांती सूर्याच्या नवविचाराने 

सखे मी विसरू शकत नाही 
ती लढाई तो कोंडमारा 
तो मनुवादाचा ग्रंथ 
जिथे जातीची भिंत उभी होती 
माणूस म्हणून न जगण्याचा 
इतिहास तुझ्या पवित्र थोतांड 
कर्मकांडाच्या संस्कृतीला मूठमाती 
दिली आहे 
दीक्षा समारंभ नवा आरंभासाठी 
नवीन अंकुरासाठी 
स्वातंत्र्यसाठी 

सखे तू असली तर माझा आनंद आहे 
तू नसलीस तर माझे दुःख आहे 
पण मी माझा नवा आरंभ कुणाकडे 
गहाण टाकणार नाही 
मानवतेच्या साखळीमध्ये घट्ट ओढलेली 
माझी संस्कृती 
मी मनात जपून आहे 
मी मनात जपून आहे
विकासाच्या नव आरंभासाठी..!💕


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. 
     शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
        आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
6.

     परिस्थिती बदलत आहे, सामाजिक दृष्टिकोन बदलत आहे. न्याय अन्यायाची भाषा बदलत आहे. बदललेल्या दृष्टिकोनाला न्यायासाठी आम्ही रस्त्यावर मेणबत्ती घेऊन उतरतो..., त्या मागची कल्पना ही समानतेची आहे.
      मेणबत्ती हे एक प्रतीक प्रकाशाचे...! अन्यायाला न्यायामध्ये परिवर्तन करण्याचे ...!बुद्ध धम्म त्या परिवर्तनाचा आधारस्तंभ आहे. दीपस्तंभ आहे.
      याच भावविश्वातून ही कविता . कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या दुरुस्त केला जातील, त्यावर संशोधन केल्या जाईल..! धन्यवाद 💕

*** मेणबत्ती ***

मेणबत्तीचा आज 
अर्थ बदलला आहे 
ती आता न्यायासाठी रस्त्यावर 
उतरली आहे 
न्याय आता रस्त्यावर 
मेणबत्ती सोबत चालते आहे 

महापुरुषांच्या विचारांना 
पायदळी तुडवत 
संस्काराची भाषा करते आहे 
पाश्चात्य संस्कृतीचा 
कणाकणात वावर होतो आहे 
महापुरुषांच्या विचारांना 
मूठमाती दिली जात आहे 

संस्कार पेरावे बुद्धांचे 
समाजात उगवलेल्या न्यायाने 
संस्कार पेरावे निस्वार्थपणे 
अंतर्मनात ....!
झिजत चाललेल्या संस्काराला 
मेणबत्तीची  आता आवश्यकता नाही 
असे सांगत 

बुद्धाच्या शिकवणीकडे पायवाट 
करावी स्वातंत्र्याची 
मेणबत्ती न्यायासाठी रस्त्यावर 
उतरू नये म्हणून 
संस्कार रुजवावे अंतर्मनात 
स्वातंत्र्य पक्षांचा किलबिलाट चोहीकडे 
उगवू देण्यासाठी 

बुद्धांनी पेरलेली मानवता 
गल्लीबोळ्यात नांदू दे 
मेणबत्त्या शोभून दिसतात 
फक्त प्रकाशासाठी 
अंधाराला उजेडात आणण्यासाठी  
मेणबत्ती कणाकणात 
विश्वरूपी शांततेसाठी 
धम्मरूपी समानतेसाठी 
जनकल्याणाच्या मार्गासाठी 

गर्जना नव्हती ती 
फक्त मध्यम मार्गाची 
तर गर्जना होती 
ती माणुसकीची 
ती माणुसकीची
दीक्षांत समारंभ हा  
साक्षीदार आहे म्हणून 
रुजवून राहू दे तो क्षण 
नव आरंभाचा माणूस बनण्याचा 
साक्षीदार म्हणून 
घरात मेणबत्तीच्या प्रकाशासोबत 
विश्वरूपी प्रकाशासाठी...!💕😀

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. 
     शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
        आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
7.

     गतीचे चक्र फिरले आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा नवीन प्रकाश ताट मिळाले जीवन समृद्धीसाठी.
       वर्णव्यवस्थेच्या क्रांतीचा नवीन आवाज म्हणजे दीक्षांत समारंभ. शूद्रत्वाचे जीवन कसे होते आणि त्यानंतर कसे झाले हे सांगणारी ही कविता या संदर्भातून याच पार्श्वभूमीतून ही कविता.
      "ताट प्रकाशाचे", ही कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल. धन्यवाद......!!


**** ताट प्रकाशाचे**** 

शब्द अंगावर यायचे 
पण शिव्याचा स्वरूपात 
आता दीक्षांतनंतर 
ते मधाळ झाले 
हृदयाच्या कप्प्यात 
अभिमानाने 
बहरलेल्या माणसातल्या 
माणसांमध्ये 

आधी नव्हते काळोखाच्या 
अंधारलेल्या जीवनयात्रेत 
शूद्रतेच्या अतिशूद्रतेच्या 
म्हणून आरंभ आहे 
नवीन अस्मितेचा 
नवीन अक्षरांच्या 
ओळखीचा
प्रकाशाच्या ताटी 

उघडलेली नवीन किमया 
जगण्याची 
आरंभ नवयुगाचा 
नवीन जीवनाचा 
नवीन शब्दांच्या उजेडाचा
प्रकाशाच्या ताटी नवयुगाचा 
रणांगणात...!💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------
8.
        "मांडला नवा डाव", ही कविता बाबासाहेबांच्या यशोगाथातील त्या क्षणासाठी आहे तो क्षण वर्गाच्या बाहेर होता. तरीही त्यांनी हार मानली नाही.
        तो वर्ग, तो फळा,तो खडू आपले जगण्याचे ऑक्सिजन आहे हे त्या बालमनावर कोरून ठेवले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या ऑक्सिजन सोबत जगत राहिले. त्या क्षणाला आधारित ही कविता.
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद....!💕🤣

*** मांडला नवा डाव ***

सरले होते सारे 
आता.... 
जगण्याच्या वाटेवरती 
पण बाबासाहेबांनी 
शिक्षणाचा नवीन 
आरंभ जगण्याचा 
श्वास ठेवला आणि ...!


नवीन दीक्षा समारंभाने 
दलितांच्या काळोखात 
नवीन पहाटवाट 
सरले 
दिस ते समारंभामुळे 
दीक्षांतराच्या ....!

बुद्धाची वाट नवयुगाची 
मानवतेची 
नवीन ओळखच 
नवजीवनवादी प्रकाशाने 
आरंभ नवयुगाचा 
नवा मांडलेल्या 
स्मिततेचा ......!

मुक्तीचा 
प्रज्ञेचा क्रांतीचा 
नवसागरक्रांतीचा 
नवीन शब्द चांदण्याचा 
शितल दरवळ 
माणुसकीचा 
अंधारलेला मानवी गर्भाच्या 
काळजात मांडला नवा डाव 
मानवतेचा.....!!❤😀🤣🌹💕💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
9.


    उध्वस्त समाजाच्या उध्वस्त कहाणीचे शिल्पकार आहे बाबासाहेब. अस्पृश्यतेच्या कैदखान्यातील हिरो आहे बाबासाहेब.म्हणून समर्पण माझे त्यांच्या त्या विचारांशी आहे जी गर्जना येवला त्यांनी केली आणि त्यानंतर जीवनभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिले माणुसकीची ओंजळ दिली.... 
       याच भाव विश्वातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल...! धन्यवाद❤

*** समर्पण ***


समर्पण माझे तुझ्या विचारांशी आहे 
म्हणून एकनिष्ठ आहे दीक्षाभूमीशी 
गर्जना भीमाची येवल्यात 
ऊन सोसूनी संघर्ष करुनी 
ज्ञानदीप उजळून समानता
बहुजनांच्या समाजात
रुजवली म्हणून
 
बुद्ध पेरला विचारांच्या 
काळा सुपीक मातीत 
पुस्तकाच्या संगतीने 
चेतना दीपस्तंभाची 
समर्पण माझे त्या विचारांशी 
स्वीकारलेल्या त्या धम्मरूपी 
समानतेचे गर्जनेशी 

होती ती माणूसकी  
म्हणून जगण्याचा हक्क दिला  
तो कणाकणात रुजवण्यासाठी 
ज्ञानाचा प्रखर प्रहार होता 
म्हणूनच समर्पण माझे 
त्या विचारांशी दीक्षाभूमीशी 
समर्पण माझे समतेशी 
समर्पण माझे त्या गर्जनेशी 
समर्पण माझे दीपस्तंभशी 
समानतेच्या वाटेवर  
जगविणाऱ्या धम्मचक्र 
परिवर्तनाशी...!!💕😀

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
10.

आयुष्याची लढाई स्वबळावर लढणारा एकमेव राजा म्हणजे," डॉ. बाबासाहेब आंबेडकर". भीमगर्जना येवलात केली आणि नवीन दिशा चळवळीला मिळाली.
       इच्छाशक्तीच्या बळावर जिद्दीने लढाई हरणार नाही या मनोबलाने. संपूर्ण बहुजन समाजाला जगण्याची नवीन वाट दिली याच भावसंवेदनेतून ही कविता.
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर योग्य पद्धतीने संशोधन केल्या जाईल. धन्यवाद...!!💕😀

*** प्रभात ***

सोनेरी किरणांसोबत नवीन प्रभात नवनिर्मितीच्या या सकाळला 
सोनेरी किनारा लाभला 
बौद्ध धम्माचा 

चैतन्यपहाट बाबासाहेबांच्या विचारांची कणाकणात फुंकतो आहे 
बहुजनांच्या समानतेशी 
निसर्ग नियम कणाकणात 
रुजविलेल्या जनमानसात 
आता नवीन पहाट आहे 
धम्मरूपी समानतेची 

नवी दिशा आहे विचारांची 
नव्या जिद्दीने 
जीवनाची लढाई आता 
धम्मासोबत 
दलितांच्या राजाची ही कहाणी 
प्रभात वेळी  विश्व कवेत घेऊन 

जगण्याचा संदेश दिला 
नाविन्याचा ध्यास मज 
त्या विचारांनी दिला 
त्या शब्दांनी पेरला कष्टरुपी 
संघर्षाच्या त्या प्रभेला वंदन आहे 
माझे दीक्षाभूमीच्या 
या धम्मचक्र परिवर्तनाच्या 
त्या फुंकलेल्या संघर्षाला 
फुंकलेल्या संघर्षाला...!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
11.


इतिहासाची पाने साक्षी आहे विकासाच्या रथक्रांतीची आरंभ नवा युगाचा ज्ञानज्योतीची पण आता परिस्थिती बदलत आहे का? हा प्रश्न मनात येऊन जातो.
       त्या मानसिकतेला आरसा दाखविण्यासाठी हे शब्द.....! त्या शब्दाच्या भाव विश्वातून भाव संवेदनेतून हे शब्द.
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद....💕😀!!

*** आरसा ***

जाणून बुजून जाऊ नको 
त्या अस्पृश्यतेच्या वर्णव्यवस्थेच्या 
वणव्यात कारण तो 
वणवा विझविला आहे 
जातीधर्माच्या गावामध्ये 
पंख प्रगतीचे छाटले होते 
आता ते पंख आकाशात 
प्रगतीच्या गाणे गाऊ दे 
माणसाला माणूस म्हणून 
जोडणाऱ्या त्या बुद्ध धम्माला 
शरण गेला नाहीस तरी चालेल 
पण एकजुटीने मात्र राहू या 
कुंपणाचे दार आता 
धम्माचे झाले आहे 
प्रेमाची भाषा इतिहास लिहून ठेवतो 
देववादाची ठिणगी 
जगण्याच्या वाटेवर लावू नको 
समानता बंधुता न्याय स्वातंत्र्य 
हेच माणसाचे गाणे आहे 
जिंकण्याच्या नशेत 
हरवणारी वर्णव्यवस्थाकडे 
जाणून बुजून जाऊ नकोस
प्रहार भिमाच्या वाणीचा 
सोबत आहे म्हणून आरसा 
तुला या चार शब्दांचा 
माणुसकीचे पाने जोडणारा 
या अनोखी प्रवासाचा 
ऊन सावलीच्या खेळाची तुलना 
न करता वसंताचा फुलोरा 
मात्र मनात ठेवूया 
दिनदुबळ्यांच्या आत्मविश्वासाची 
विज्ञानयुगाच्या बुद्धाकडेच आहे 
स्वयंःदीप होण्यासाठी 
आरसा आहे या शब्दात 
वैचारिक स्वयंभू होण्याचा 
मध्यम मार्गाच्या 
जगण्याचा....!!💕😀


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
12.

*** माझ्या वेलीवर ***

माझ्या वेलीवर वेदना होत्या 
बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने  
अश्रूचे सोने झाले 
देहाचे मंदिर झाले 
सुकलेल्या शरीराचे

तुमच्याच कुशीत माझे सर्वस्व 
समर्पित आहे  
व्याकुळ क्षणांच्या व्याकुळ जीवाला 
जगणे आता सुखात आहे 
विविध रूपात 

जवळपास वेदना नसलेला 
काळोखाच्या मनात 
थकलेल्या जीवाला 
आता विसावा प्रेरणादायी 
तुझ्या शब्दांच्या माझ्या वेलीवर 

सुखाचे फुल उगवत आहे 
टपोरे पांढरा रंगाचे 
जगणे आता 
निळे झाले आहे चोहीकडे  
जगण्याचा महाभारतात  

चक्रव्यूह तुमच्या शब्दांचे 
म्हणून जगणे लढणे असणे 
माझे फक्त तुमच्याच वेलीवर 
आणि विचारांसोबत नवयुगाच्या 
परिवर्तनासोबत


माझ्या वेलीवरचे फुल शीतल आहेत शिंपल्यातल्या मोतीसारखे
दीक्षा समारंभ माझ्या अस्तित्वाच्या 
लढाईची नवयुगाचा आरंभ 
खडतड प्रवासाच्या वेलीवरचा 

माझ्या वेलीवर वेदना होता 
बाबासाहेब तुमच्या वैचारिका आलिंगनाने 
अश्रूचे सोने झाले 
अश्रूचे सोने ...!!💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
13.

      रंजल्या गांजल्या समाजाला समानतेची शिदोरी डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि बहिष्कृत समाज गाव कुशाबाहेरून आता आला. प्रथेला धम्माची जोड तत्त्वज्ञानाची नवीन दार उघडले आणि वाटेला समानता आली त्याच भावविश्वातून कविता.
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन करून दुरुस्त केल्या जातील. कविता ह्या कविच्या भाव विश्वातल्या त्या क्षणांचे विचार असतात.

*** समानता ***

आयुष्याच्या पानापानावर लिहिले 
आहेस तू मानवतेच्या गाथेचे अभंग जनमानसाच्या स्वातंत्र्याचे 
बाबासाहेब कळावे म्हणून 
दीक्षाभूमीकडे पाय वळतात 
जुन्याच वाटेवर नवीन वाट शोधण्यासाठी 
पण कळते त्यावेळी निखाऱ्याची धकधक 
ती क्रांती नवयुगाची 

लिहावे वाटते तेव्हा न समजणारे 
तेही शब्द तिथे अस्पृश्यता 
नावाची एक शाळा होती 
रक्ताचे पाणी करूनही ती जात नव्हती रथक्रांतीचा करून हातात 
दिली समानता 
डोळ्यातले पाणी डोळ्यात न ठेवता 
हसऱ्या डोळ्यांनी 

दीक्षा दिली समानतेची 
समता न्याय बंधुता सगळ कस 
विषमतेवर प्रहार करणारे 
कितपत पडलो होतो गळत्या रानातल्या पानगळी सारखे पण पालवी 
कुठेच नव्हती  

आता ती पालवी आहे 
संविधानाची लेखणीची शिक्षणाची 
आता ती पालवी आहे 
समानतेची 
आता ती पालवी आहे 
स्वच्छ बाटलीबंद पाण्याची 
आता ती पालवी आहे 
बहुजनांची 
नष्ट झालेल्या अस्पृश्यतेची 
आता ती पालवी आहे 
पुस्तकाच्या ज्ञानाची 
आता ती पालवी आहे 
भिमरायाच्या शिकवणीची 
आता ती पालवी आहे 
निळ्या रक्ताची 

आता ती समानता आहे 
मानवतेची 
आता ती पालवी आहे 
समानतेच्या ज्ञानाची 
आता ती पालवी आहे 
समानतेच्या मशालीची 
आता ती पालवी आहे 
समानतेच्या उजेडाची 
आता ती पालवी आहे 
हक्काची न्यायाची अभिमानाची 
आता ती पालवी आहे 
बाबासाहेबांच्या विचारांची 
आता ती पालवी आहे 
धम्माची श्वासात गुंफलेली 
स्वयंदीप होण्याची 
आता ती पालवी आहे उज्वल 
भविष्याची 
उज्वल समानतेच्या प्रज्ञा सूर्याची 
मानवीविज्ञानची 
समानतेच्या रानात...❤🤣

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
  14.


       बाप नावाचा देव माणूस आमच्या आयुष्यात आला आणि माणसातल्या माणसाला माणूस करून ठेवला अशा बापाची ही कहाणी. शब्दात काव्यबद्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
         कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्या दुरुस्त केला जातील. त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद......!!

      ***** बापमाणूस *****

नावातच सर्व काही आले 
असे वाटते,
माझ्या बापाने आधी माणूस बसविले 
कष्टाच्या जोरावर 
जगण्याच्या महामंत्र दिला 
गोरगरिबांच्या झोपडीला उजेडात 
आणले ज्ञानाच्या मशाली 
झोपडी झोपडी मध्ये पेटविला 
जळलेल्या अंतकरणाला 
जय - भीमचा नारा दिला 
वळविले सर्व आयुष्य दीक्षाभूमीकडे स्वाभिमानासाठी झोपडीत 
नवीन सूर्यप्रकाश दिसावा म्हणून

मानवतेच्या निर्मितीसाठी 
तो माझ्या बाबाचा आणि माझ्या आज्याचाही बावाचा(वडील) बाप झाला म्हणून....!
मी माणसात आहे 
बांधलेल्या सर्व भिंती तोडीत 
न्याय हक्कासाठी लोकशाहीसाठी
उन्हाच्या चटक्यामध्ये श्रावणाची हिरवळ 
 ......माझा बाप आहे

शब्द लिहिता येत नाही बाबासाहेब 
हीच ती व्यक्ती ज्याच्यासाठी 
उभेशब्द काव्य फुले कमी पडतात 
रंजल्या गांजल्यांचा बाप होणे 
सोपे नाही 
आपल्या स्वतःच्या रक्ताची मुले 
गेली तरी बाप माणूस थांबला नाही 
आम्हा जगविण्यासाठी 
नवा सूर्योदय करण्यासाठी 
दीक्षा एक आरंभ नवयुगाच्या 
नव उगवत्या भास्कराचा 
शतकानुशतके अंधारातील स्वातंत्र्याचा 
नवा आरंभ जगण्याचा  

माझ्या बापाने पिंजऱ्यातून मुक्त केले 
तो माझा बाप होता 
ज्ञानाच्या मशालीत.....
मनात मेंदू आणि हातात देऊन 
झोपडी - झोपडीत नवा आरंभ 
निर्माण केला 
नवा सूर्योदय विझू नये म्हणून
तो बाप माणूस होता...!!💕


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
  15.


     आयुष्यात दुःखाचा हंबरडा दाही  दिशेने आपल्या समोर येत आहे पण आपली वाट जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली आहे जी प्रकाशाची आहे ती वाट आपण सोडायची नाही का ?कशासाठी ..? याच भावविश्वातून, याच भावसंवेदनेतून  याच पार्श्वभूमीवरून ही कविता.      
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद....!💕

**** दुःख ****

दुःख दुःख करत बसू नको 
बाबासाहेबांनी दिलेला पायवाटेवरून 
चालत रहा, जगण्याला बळ देईल 
ऊर्जा देईल मन स्वच्छ निर्मळ 
वाहते राहील विद्रोहाचा रणभूमीवर 

वाहते राहणे अटळ आहे 
वादळ कधीही येऊन 
गिळून जाईल म्हणून 
दीक्षाभूमीची वाट तेवढी 
माहीत करून ठेव 
संदेश देणाऱ्या स्तूपाला चौफर 
घट्ट आलिंगन देऊन ठेव 

वेदनेचा आविष्कार होत राहील 
पण विचारांचे तेज काळोखात 
जाऊ देणार नाही 
जगण्याची वाट बाबासाहेब 
देऊन गेले गतीचे चक्र फिरून गेले 
मुक्तीचा लढा लढून गेले 
समानतेच्या न्यायावर नवीन 
फुले वाहून गेले 
म्हणून दुःख दुःख करत बसू नको 

जागृतीचे केंद्र जबाबदारीने 
आपला खांद्यावर देऊन गेले 
अंधाराचा अस्त करून काटेरी 
जगण्याची वाट प्रकाशमय 
वाटेत परिवर्तित करून 
मानवतेचा नवीन संदेश 
आयुष्याला देऊन गेले 
म्हणून दुःख दुःख करत बसू नको 

परिवर्तनाचा सूर्य 
जगण्याची प्रकाशवाट 
पाण्याचा रंग आपलाच  
श्रद्धेने आपल्याजवळ ठेवूया 
जळणारे जळत राहतील 
वादळे येत राहतील 
पण मानवतेच्या सोनेरी पहाटेला 
आपण आपल्या दीक्षाभूमीच्या 
प्रकाशमय तेजाने क्रांतीची ऊर्जा 
समानतेच्या बीजाने 
समाज रचनेच्या मातीत पेरू या 

दुःख दुःख करत बसू नको 
बाबासाहेबांनी दिलेल्या पायवाटेवरून 
चालत राहा 
दीक्षा एक आरांभ नव युगाच्या 
मानवतेच्या क्रांतीचा
जबाबदारीने वागू या 
मानवतेच्या वटवृक्षाला घट्ट 
मातीत पेरू या 
विचारांची नवीन पायवाट 
दिसणार नाही पण बाबासाहेबांनी 
दिलेली लाट आपलीच आहे 
दीक्षा एक आरंभ नव युगाचा 
इवल्याशा पावलांचा इवल्याशा 
पावलांसाठी.. !!💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

16.


             बाबासाहेब नावाचा सूर्य जर उगवला नसता तर अस्पृश्यांच्या आयुष्यात जो सूर्य दिसतो आहे तो सूर्योदय कधीच झाला नसता म्हणून बाबासाहेब आमचे दैवत आहे. नवीन जीवनशैलीचे मार्गदाता आहे.
        याच भावविश्वातून ही कविता. कविता  स्वलिखित  आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केला जाईल आणि त्या दुरुस्त केल्या जातील.

*** सूर्य ***

जळतील साऱ्या रूढी प्रथा परंपरा 
अशी कोणतीही आग नव्हती  
नवीन वाट पेटविले जातीयवाद्याची 
शहाणे झाले ते सूर्याची आग पाहून 
म्हणून इतिहास जमा असलेल्याही 
रूढी चालू केल्या अक्कल शून्य 
अमावस्येच्या लोकांनी 

आम्ही अस्पृश्यतेचे वाण घेऊन जगलो 
शिक्षेच्या रूपात आम्ही मूर्ख गाढवाचे 
पाय धुऊन पिलो 
पायरी नि पायरी झिजविली 
पण पावला नाही कुणास 
घोटभर पाण्यासाठी 
की बोलला नाही कुणास 
मुभा होती त्याला नशिबाच्या दाराची 
जीवन गाथा आमच्या कर्म फळाची 

म्हणूनच जाळल्या सर्व प्रथा मनुस्मृतीच्या झोपडीतल्या अंधाराच्या वाईटावर 
मात केली मानवतेच्या धम्माने 
एक घोट पाण्यासाठी 
परंपरा मोडीत काढत
क्रांती नवी धम्माची
पाण्याचा विटाळ नसलेल्या धम्माची 

आदर्श विश्वासाचा 
मुहूर्तमेढ नवीन समाजाची 
प्रहार नवीन क्रांतीचा 
नवीन सूर्याचा समानतेचा 
जळत्या रुढीला निखारा सूर्याचा 
कर्तुत्ववान समाजाची 
सूर्य तो ची निळा रंगाचा 
सम्यकक्रांतीचा सूर्योदयाचा 

आदर्श माणुसकीचा 
लढा तोची इतिहासाच्या 
सुवर्ण अक्षराचा शिदोरी देऊनी 
संविधानाची आचार विचार मुलतत्वे 
सांगून दिव्य तंत्र दिले 
दिव्य मूलमंत्र दिले 
तोची सूर्य क्रांती सूर्याचा 
महामानवाचा....❤


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
      


    17.

      मी मानतो माझ्या खरा इतिहास , कारण त्या इतिहासामुळे भाग्यविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उन्हाची दाहकता सावलीमध्ये परिवर्तित केली दीक्षांतरानंतर नव आरंग नवयुगाचा आत्मसन्मानाने जगण्यासाठी. सामान्य माणसाला समानतेची  पायवाट  आत्मसन्मान आत्मविश्वास ....!!❤
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..💕💕


**माणूसपण**

मी मानतो माझा 
खरा इतिहास विचारांचा 
जळलेल्या वर्णव्यवस्थेचा 
चालीरीतींना मूठमाती देणारा 
धर्मनिरपेक्षतेकडे नेणारा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास संघर्षाचा ज्वालांचा 
जळजळीत इंजन देणार 
अंधश्रद्धेला पायदळी तुडविणारा  
विषमतेला खोल दरीत फेकणारा 
समानतेच्या वाटेवर चालणारा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास मुळासकट वर्णव्यवस्थेला 
जाळून टाकणारा 
प्रश्नांच्या प्रत्येक प्रश्नांना 
उत्तर देणारा 
माणसातील माणसाला सजीव करणारा 
पंचशीलाच्या शब्दानी जग जिंकणारा 
म्हणून लिहिते आहे सविता
नवा आरंभ नवयुगाचा 
नवा धम्म क्रांतीचा 
माणुसकीचा माणसातल्या 
माणसातील अस्तित्वाचा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास इतिहासातील 
पानांमध्ये शूरवीरांच्या पिढ्यांचा 
आरंभ नवयुगाचा 
आरंभ नव्या महास्फोटाचा 
आधुनिकतेच्या विचारांचा 
आधुनिकतेच्या महाज्योतीचा

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹




--------------------------------------------------------------------------

18.

       "मातीच्या गर्भात", हे कविता बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थावादी व्यवस्थेवर प्रकाशाची मनामध्ये खोल कुठेतरी वादळाची पेरणी केली. सोनेरी पहाटे साठी आणि ती पहाट म्हणजे दीक्षांत सोहळा..!!
      जीवनाच्या वाटा संघर्षाने भरलेल्या असतानाही त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला सोबत घेतले नाही. समाज व्यवस्था बदलीविणारे बाबासाहेब यांनी समानतेची वाट बोधिसत्वाची तत्त्वज्ञान जे मूळ भारतीय होते ते समाजामध्ये रुजविले एक आरंभ नवयुगाचा चालू झाला.
       नवीन फुललेल्या मनामध्ये..❤🤣 याच पार्श्वभूमीवर ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...! त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद..!!❤ 

**मातीच्या गर्भात***

बाबासाहेब शेवाळलेल्या चिखलात 
मानवता वसविले 
झुंजार ज्ञान योद्धाच्या अक्षरांनी 
आम्हामध्ये मानवता बसवीली 
लढणाऱ्या संघर्षाच्या यशाच्या 
सर्वच वाटा बंद होत्या 
मानव म्हणून जगण्याच्या 

सर्वच पायवाटा घट्ट बांधल्या गेल्या होत्या 
माणसे कापली विटाळाने 
माणसा जळली विटाळाने 
माणसे भुकेने मेली विटाळाने 
नाचवली पोर विटाळने 
फक्त एक मात्र राहून गेल 
पेटत्या वस्तीत राखेसोबत विटाळ 
मानवता रक्ताच्या काळोखात नष्ट झाली 
श्रद्धा तितकी मात्र जिंकली 

म्हणून बाबासाहेब तुम्ही 
आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात आहात अंतर्मनाच्या वेधामध्ये आहात 
अक्षरांच्या शब्द शब्दामध्ये आहात 
अमानुष्याच्या इतिहासात मेणबत्तीचा 
प्रकाश आहात 

मनामनात धगधगणाऱ्या ज्वालामुखीवर 
तुम्ही दिलेला दीक्षांतराचा लोकशाहीच्या मूल्यांचा शांतीचा एल्गार आहात 
दीक्षांतराने बोधिसत्वाच्या विचारांची 
पेरणी करणारे तुम्ही 
महामानव आहात 
रक्तात मानवता, रक्तात संघर्ष 
रक्तात स्वप्नांची नवमुल्यांची 
कास धरणारी विचारसरणी 
दीक्षांतरानंतरची 

चालते आहे मी ....💕
एक नवीन पायवाट 
मानवतेची; रुढीवादी परंपरेवर 
शब्दांची तलवार पेटती ठेवणार आहे प्रज्ञासूर्यासाठी उजेडात दीक्षांतराच्या सोहळ्यानंतर मनाचा
मातीच्या गर्भात



 ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



-------------------------------------
19.

     "तू विसरू नको माणसा", ही कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
     आंबेडकरवादी म्हणणारे आंबेडकरी चळवळीचे ध्येय आणि धोरण विसरत चालले आहे का..?? हा प्रश्नचिन्ह समोर आला आणि  या कवितेची रचना झाली. कविता कुणावरही परखडपणे आरोप करत नाही. कवीला पडलेला या प्रश्नाचे उत्तर तो या कविते शोधतो आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद...!❤

        *** तू विसरू नको माणसा ***

माणसातला माणसा तुला अरे ले का रे म्हणण्यासाठी कोणी शिकविले वास्तवाची जाणीव कुणी करून दिली 
सहन होत नाही रे आता 
झुंडशाहीची संघर्षाची भाषा 
आपलेच आपल्याला डोळे मोठे करून दाखवितात अनुभवाची शिदोरी सोबत 
असूनही सामर्थ्याचे  प्रतीक आपल्याला दाखवितात 
गावकुशाबाहेर आहे जीवन 
आपल्याला माहित आहे वेदना  
पण आता रडायचे कशासाठी 
हे समजत नाही 

तुझी डोळे किंवा माझे डोळे यात काय फरक मीही ती क्रांती पाहिली आहे 
जी बाबासाहेबांनी पुस्तकात लिहून ठेवली आहे तू ही ती चळवळ पाहिली असेल 
जी पुस्तकात लिहून ठेवली आहे 
अनुभवाची शिदोरी तुझ्याजवळही 
माझ्याजवळ पण लेकरा 
बाबासाहेबांची क्रांतीची भाषा समानतेची होती हेही समजून नको 

कारण समाजव्यवस्था ही कधीही कुणासाठी कोणत्याही क्रांतीची भाषा समजून घेत नाही 
ती समजून घेते 
फक्त आपलपोटी भाषा 
रोज जगण्याच्या विलक्षण अनुभवाने 
ती हलाखीच्या परिस्थितीत तशीच असते संघर्षाच्या वेलीवर सुद्धा 
विद्रोह कुठे करायचा माहित नाही 
जाणिवा कुठे मांडायच्या माहित नाही 
आशावाद कुठे ठेवायचा माहित नाही 
व्यथावेदना कुठे मांडायच्या माहित नाही अस्तित्वाची परिभाषा कोणती माहित नाही उपेक्षितांचे दुःखांच्या वेदनेचे जीवन कुठे मांडायचे माहित नाही 

वास्तवाचे समीकरण कोणत्या समीकरणाने सोडवायचे माहित नाही 
पण मी तिथेच आहे जिथे बाबासाहेबानी 
मला असायला हवे असे सांगितले 
मी तिथेच आहे मला जिथे राहायचे आहे 
तिथेच पण तू बदलला तुझ्यातील वेदना 
बदलला तू आता मांडीला मांडी लावून 
दुसरीकडे कुठेतरी बसलेला आहे 
तू संपूर्णपणे माणूस झाला आहे 
त्यांच्या विचारांचा 

बाभळीला फुले येईल पण काटेही येईलच संस्कृतीचे झाड लाव पण 
आक्रोश करायला विसरू नको 
तरच तू माझा आहेस 
माझ्या माझ्यातील बाबासाहेबांचा आहे 
नवीन आरंभ नवयुगाच्या नवक्रांतीच्या 
त्या आरंभबिंदूपासून तुझा प्रवास चालू आहे 

जग हसत असेल जग रडतही असते जागधिकारही करीत असे 
तरी चालेल दुःखाची नवीन ओंजळ 
तू देऊ नको 
जुन्या जखमांच्या खपला काढू नको 

तू विसरू नको 
अज्ञानाचा पाढा
तू विसरू नको परखड शब्दांची भाषा 
तू विसरू नको जगण्याची वाट 
तू विसरू नको डोळ्यातील अपयश 
तू विसरू नको दारिद्र्य 
तू विसरू नको, व्यापक दृष्टिकोन 
तो विसरु नको आधुनिकतेची जाणीव 
तू विसरू नको अंधारातला दहशतवाद 
तू विसरु नको सहनशीलता न जपणारी 
तरीही सहनशील असण्याची 
तू विसरू नको माणसातला
तेजाची नवदिशाची भाषा 
तू विसरू नको बदलत्या दुःखाची भाषा 
तू विसरू नको उगवलेला सूर्य पहाटेचा 
तू विसरू नको अंधाराची भाषा 
तू विसरु नको विचारांचा संघर्ष  
तू विसरू नको पिंजऱ्यातला पोपट  
भाकरीची किंमत सोसलेल्या वेदना 
अश्रूंच्या संवेदना 

संघर्षाची धकधकत असलेल्या क्रांतीची भाषा स्वाभिमानाची देणगी 
माणसातल्या माणसा तुला कोणी शिकविले अरे ले का रे म्हणण्याची भाषा 
तू विसरू नको त्या महामानवाला 
नव आरंभ देणाऱ्या त्या महाज्योतीला...!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================
20.

    कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.कविता बाबासाहेबांच्या जयंतीची आहे. 14 एप्रिल म्हणजे त्या महामानवाची जयंती ज्याने माणसाला समानतेची शिकवण दिली. बुद्ध दिले.
         नव आरंभ नवयुगाचा माणुसकीचा दिला. कवितेत काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केल्या जाईल..! धन्यवाद❤❤

 ****** जयंती *****

गाण भिमाचा लाव
माझ्या बापाच्या जयंतीच लाव
गुणगान कर माझ्या बापाच्या लेखणीच 
आयुष्याच्या आनंदाच 
नाच बेधुंद होऊन 
कधी शब्दांसोबत 
कधी विद्रोहासोबत 
कधी न्यायासाठी लढ 
 तर कधी स्वाभिमानासाठी 
एक ग्लासाच्या पाण्यासाठी चक्क 
चळवळ उभी व्हावी माझ्या भिमाचा
 इतिहास आहे संविधानापर्यंतचा...
 गड्या भावा भावड्या 
काय तू फुलला चिखलात 
शेवाळ्यात डबक्यात
कधीच नाही 
तू फुलला माझ्या बापामुळे 
निळ्या आसमंतात 
 तू फुलला माझ्या युगंधरामुळे 
तू फुलला शिल्पकाराच्या विचारांनी 
तू फुलला बहिष्कृत असूनही 
बोधिसत्वाच्या तत्वाने 
तहानलेल्या विचाराने 
त्या विचाराचं
 गाणं लाव 
या बाप्पाच्या जयंतीचे गाणे लावा
 समानतेच्या चळवळीतला माणसाच्या 
मनातल गाणं लाव


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



============================

21.

     "नवज्योत", कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
        बाबासाहेब हे माझ्या विचारांना माझ्या शब्दांना माझ्या प्रतिभेला एक नवीन वळण देत राहते. नेहमीच मला जिथे जिथे बाबासाहेबांचे विचारांची पायवाट दिसते तिथे मी थांबते. माझ्या बालबुद्धीला पटेल तस लिहीते 
       आवडल्यास किंवा काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर परत विचार केला जाईल. सुधारणा केल्या जाईल...!! धन्यवाद...❤

*** नवज्योत *** 

बाबासाहेब नवा आरंभ नव युगाचा 
प्रभावी इथल्या 
जातीव्यवस्थेला माती करण्यास 
वर्षानुवर्ष घराघरात पाळली 
गेलेली परंपरा तू 
संविधानाने 
हद्दपार केली 
लढाई ही फक्त त्यासाठीच नव्हती 
जिंकणे हेच एक ध्येय होते 
लढाई फक्त त्यासाठीच नव्हती 
लढाई होती माणुसकीची 
लढाई आपल्या स्वप्नांची 
लढाई आपल्या हक्काची 
समानतेच्या एकात्मतेच्या बंधुत्वाच्या शब्दांना स्पर्श असणारी 
आणि पुढे जे झाले 
धम्मक्रांतीचा उदय झाला 
नव्या आरंभ नवयुगाचा 
तो इतिहास झाला
नव आरंभ नवयुगाच्या 
नवज्योती क्रांतीचा 
माणसातल्या माणसातला 
बाबासाहेब तुम्ही नवी ज्योत लावली
अखंड ..... 
समानतेची ....!!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

   


============================
22. 



      "सोहळा", ही कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद❤❤


*** सोहळा ***

हजार वर्षाचा इतिहास सोनेरी पानाने
लिहिणाऱ्या माझ्या बापाची जयंती 
अन्यायाविरुद्ध बंड करणारा 
अमानुषतेचा सागरावर बंड करणारा 
रूढी परंपरेला मुठमाती देणारा 
माझ्या बापाची जयंती 
तहानलेला पाणी देणारा 
आसमंत निळा पाखरांचा थवा 
नव्या दमाच्या नव्या प्रगतीचा 
नव्या सृष्टीचा निर्माता 
व्यवस्थेला आपल्या ज्ञानाच्या ज्योतीने 
मोकार सुटलेला परंपरेला स्वार्थी 
उद्याच्या - आजचा सूर्य दाखविला 
धर्माच्या गुलामगिरीला संविधानाने लोकशाहीने 
नष्ट केला त्या हजारो वर्षाच्या 
बदलविणाऱ्याची जयंती 
चला नाचू गाऊ सोबत 
ज्ञानाची ज्योत लावू 
पुस्तकाचे महत्व समजून सांगू 
डीजेच्या तालावर ताल धरताना 
पुस्तकाची किंमत जगाला सांगून देऊ 
शाळा नावाचा इमारत काय असते 
शिक्षणाची धुरा सांभाळताना आमची 
म्हणून चला नाचू गाऊ या 
घर सजवूया अंगणात रांगोळीचा 
बहरदार रुबाबदार असा 
बाबासाहेबांचा जय भीम चा घोषवाक्य 
लिहू या 
विटाळ्याचा सावलीचा अभिमान 
असणाऱ्या समाज व्यवस्थेला 
माझ्या बापाच्या जयंतीचा सोहळा  
दाखवू या...!!❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


============================

23.

      "आंबेडकरवाद,"ही कविता बाबासाहेब अगदी थोडक्यात शब्दात लिहिण्याचा प्रयत्न.                  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल..!!❤

*** आंबेडकरवाद ***

आंबेडकरवाद म्हणजे विवेक गती तर्क  आंबेडकरवाद म्हणजे विज्ञानवादी विचार आंबेडकरवादी म्हणजे बुद्धाचा नवीन धम्म आंबेडकरवाद म्हणजे  विचारांची पेरणा   
आंबेडकरवाद म्हणजे विचारांची नवीन प्रेरणा आंबेडकरवाद म्हणजे विषम व्यवस्थेला समानतेची शिकवण 

आंबेडकरवाद म्हणजे समता स्वातंत्र्य न्याय नीतिमत्ता 
आंबेडकरवाद म्हणजे क्रांती परिवर्तनाची आंबेडकरवाद म्हणजे माणसाने माणसासारखे वागणे 
आंबेडकरवाद म्हणजे नवीन मूल्य 
आंबेडकरवाद म्हणजे शांतता विद्रोहाच्या स्वरूपात नवक्रांतीची 
आंबेडकरवाद म्हणजे लोकशाही 
आंबेडकरावाद म्हणजे चातुर्यवर्णव्यवस्थेच्या दगडाखाली फुललेले नाजूक वेल 
आंबेडकरवाद म्हणजे बंडखोरी 
आंबेडकरवाद म्हणजे पाऊस नवविचारांचे

आंबेडकरवाद म्हणजे नवी नीतिमत्ता 
आंबेडकरवाद म्हणजे विचारांच्या समानतेचे रोप आंबेडकरवाद म्हणजे खंबीरपणा मवाळवाद आंबेडकरवाद म्हणजे निर्भीड प्रखर तेजस्वी 
पण शांत विद्रोहाचा ज्वलंत कोळसा

आंबेडकरवाद म्हणजे लोकशाहीची पहिल पान आंबेडकरवाद म्हणजे मूलभूत हक्क व्यक्ती विकास स्वातंत्र्य 
आंबेडकरवाद म्हणजे अनीतीला नीतीने परिवर्तित करणाऱ्या शब्दांची सुंदर 
मोत्यांची माळ 
आंबेडकरवाद म्हणजे मेलेल्या समाजाला 
जिवंत करणारी संजीवनी बुटी 


आंबेडकरवाद म्हणजे तत्वज्ञान 
आंबेडकरवाद म्हणजे इतिहासाच्या पानातील सुवर्णक्षण 
आंबेडकरवाद म्हणजे जागृती विचारांची शिक्षणाची उन्नतीची मूल्यांची 
आंबेडकरवाद म्हणजे बंडखोरी मानवतेसाठी 
आंबेडकरवाद म्हणजे नवे पंख न्यायाचे आंबेडकरवाद एका शब्दात लिहिता येत नाही मांडता येत नाही 
आंबेडकरवाद म्हणजे नवीन आरंभ नवयुगाच

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================
24.


     बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आणि अध्यात्मिक चळवळ बाबासाहेबांनी समाज व्यवस्थेमध्ये रुजली ही चळवळ पहिला पाऊल म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारणे. नव  आरंभ नवयुगाचा हा काव्यसंग्रह याच पहिल्या आरंभबिंदूला समर्पित आहे.
      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चुका आढळलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद...!!❤

**** महामानवता****

शून्यातून झालेला प्रवास आता 
इतिहासाचे सोनेरी पान आहे 
अस्पृश्यतेच्या नावाखाली 
व्यवस्थेच्या बाजाराला विचाराची 
सोबत दिली 
त्यांचे नाव बाबासाहेब आहे 

विकासाचा मानबिंदू बघता बघता 
महास्फोटात परिवर्तित झाला 
देशाला समानतेचे वादळात नेणारे 
बाबासाहेबांचे विचार आता पायवाट झाली  नवीन आरंभ झाला 
घराघरात संविधानाचा 

दीक्षांत समारंभानंतर 
वर्गाच्या बाहेर बसलेला महामानव 
संविधान निर्माता झाला 
आणि तडाच गेला 
सामाजिक बांधिलकीचा वर्णव्यवस्थेला वर्गाबाहेर बसलेले देव माणसामुळे
नवीन आरंभ करणाऱ्या 
नवीन समाजव्यवस्था रुजविणाऱ्या 
महामानवाने युगंधराने शिल्पकाराने 
नवाआरंभ नवी शक्ती जगाला दाखवून दिली अंधारातल्या प्रकाशाचा तेज 
नव आरंभ नवयुगाचा 
बोधिसत्व महामानवतेचा ❤

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================

25.

     वास्तवतेच्या जगात नवीन फुलोरा फुटला आहे. जिद्दीने तळमळीने गाव कुशाबाहेरील अंगण गावात आली आहे, तरीही माणसाला माणसाच्या प्रवासात रूढीवादी परंपरेचे अंगण मोक्ष मिळवण्यासाठी हवे आहे.... पाप धुण्यासाठी हवे आहे....., याच भाव संवेदनेतून ही कविता.
       माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क नाकारणाऱ्या रूढीवादी परंपरेवर भाष्य करणारी ही कविता...!!💔
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...! त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद..!!❤

*** नवीन पायवाट ***

रक्ताचे पाणी करून नवीन
धम्म संस्कृती आम्हाला दिली 
पण आता मानवता कुठेतरी 
हरत चालली आहे 
परत धर्मव्यवस्थेच्या 
नवीन विचारसरणीकडे 

मानवता कुठेतरी हरत चालली आहे 
म्हणून चेंगळाचंगळी आम्हाला 
दिसत नाही चपलांच्या सुंदर  
आकृत्या कोणत्याच मीडियाच्या 
कॅमेऱ्यामध्ये save  होत नाही
कोणत्याही नदीच्या काठी 
दिसत दिसतच नाही तिथे 

चाललेला व्यवहारवाद दिसत नाही 
सर्व काही OK OK  
पण कासावीस होते चेंगाळली 
गेलेली माणसे पाहून 
आयुष्यभर सांभाळलेली मुले 
रक्तांनी माखलेले वृद्ध 
उघडे बंब असलेली ही व्यवस्था 
बंद दाराआड 
फक्त कागदे चालत आहे 
बोटांच्या अक्षरांनी  
आता इतर व्यवहार होत आहे 
दलाल मात्र हा हाफ चड्डीतच 
फिरतो आहे 

आम्ही बघतो आहोत 
सर्व उघड्या डोळ्यांनी 
माणसाच्या घनदाट जंगलात 
कारण आम्ही परिवर्तनवादाच्या 
नवीन विचारसरणी बरोबर चालत आहोत 
तिथे मोक्ष फक्त जाहिरातीमध्ये  
पण इथे उजेडात असतो मानवता 

कुठे कुठे जात आहे कळत नाही 
चालू प्रवास 
हा कोणत्या हृदयाच्या आत 
दडला गेला आहे 
कळत नाही 
तू दिलेली मानवता बुद्ध 
आमच्या नसानसात पेरला हेच आता 
बरे झाले 
कोसळत्या बुद्ध वाणीमुळे 
रक्ताच्या थेंबा थेंबात आता 
फक्त बुद्धच जिवंत ठेवतो आहे 
कर्मकांड ही फक्त 
अंधारयुगाच्या प्रकाशाला जखडून 
ठेवणारी गोष्ट आहे 

हे परत बाबासाहेब सिद्ध झाले 
म्हणून दीक्षांतरानंतरचा प्रवास 
माझा उजेडाचा आहे 
माझ्या प्रत्येक उंबरठ्यावर उभा 
असलेल्या प्रकाशाचा आहे 
दीक्षांतरानंतर गुदमरलेला आयुष्याला 
नवीन पहाट आहे 

मला माझ्या अस्तित्वाच्या विचारांची 
जोपासना करणारा नवीन 
महामार्ग आहे 
दीक्षांतरानंतर आम्ही विचारांची 
जुनीच पण नवीन मशाल पेटवली आहे 
दीक्षांतरानंतर आमची वाट 
मोकळी आहे 
विचारांची प्रगतीची मानवतेची 
आणि  जगण्याची 
वास्तववादी जगण्याच्या 
नवीन पायवाटेमध्ये


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------------------------------------------


26. 

     "समानतेच्या जंगलासाठी", ही कविता मोकळा श्वास घेणारी आहे. जगण्याची निळा पाखरांना स्वातंत्र्य मिळाले दिशादशा सर्व काही मिळाले म्हणून आम्ही माणुसकीच्या समानतेच्या जंगलासाठी ज्वालामुखी वर सुद्धा चालायला तयार आहे, याच भावसंवेदनेतून ही कविता......!!💕
      आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...! त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद..!!❤



*** समानतेच्या जंगलासाठी ***

डोक्यावरचा आभाळ 
जिद्दीने मानवतेचे केले 
जे पचल तेच रुजविले 
बाबासाहेबांनी 
काजव्यांच्या या वर्णव्यवस्थेमध्ये 
उजेडाचा प्रकाश घट्ट रुजविला 
आकाशात फक्त पक्षी उडत नाही 
आपले स्वप्नही उडतात 
असे निळा पाखरांच्या मनात 
स्वप्न लावीले 
नवमूल्याची नवीन पायवाट  
अस्तित्वाच्या वास्तवात 

गुदमरलेल्या जीवनावर नवीन 
हळुवार मायेचा पदर दिला 
वर्गाबाहेर बसून शिकला म्हणून 
आता शब्दांच्या सोबत नवीन
जगण्याच्या प्रकाशावर 
बाबासाहेब तुमचे नाव आहे 
उंबरठा कोणताही असू दे 
त्यावर फक्त तुमची विचारसरणी आहे कोसळत्या धबधब्यांसारखे 
तुमच्या विचारांची सोबत आहे 

आमचा प्रवास थांबला नाही 
जिथून चालू झाला 
तिथेही थांबला नाही 
निळी प्रकाशाची झालर 
कोणत्याही वर्णव्यवस्थेसमोर  
थांबत नाही 
ती त्यांची व्यवस्था आहे 
आमची व्यवस्था दीक्षांतराने 
माणसाच्या प्रवासात आली 
जगण्याच्या ऊर्जेला 
गौतम बुद्धाची साथ आली 
परिवर्तनवादी विचारांवर 
अस्पृश्यतेच्या इतिहासाची धारदार 
तलवार आली 

बुद्ध बसविला मनाच्या गर्भात 
अमानुष्याच्या घनदाट जंगलात 
म्हणून आता आम्ही रुढीवादी 
काजव्यांना भीक घालत नाही 
संविधान अजून जिवंत आहे 
दीक्षांतरानंतरचा प्रवास जिवंत आहे 
तीच जिद्द तळमळ प्रेरणा 
स्वातंत्र्य समता बंधुत्व 
अभिव्यक्ती स्वातंत्र्य 
सर्व काही जिवंत आहे 
मोकळा श्वास घेण्यापर्यंत 

म्हणून नवीन फुलोरा फुलवला आहे 
दीक्षांतराच्या सोहळ्यानंतर  
अजूनही लोकशाहीची पेरणी समाजात 
रुजवत आहोत 
कुणाच्या मनात असो या नसो 
कारण दीक्षांतराच्या सोहळानंतर 
आम्ही माणूस झालो 
सुरेख प्रवासाचा झऱ्यामध्ये 
सुवर्णक्षणाच्या उगवत्या शब्दांसारखे निखाऱ्यात ज्वालामुखी न पेरता 
मानवता वसविण्सायाठी 
धगधगणाऱ्या क्रांतीज्वालाची मशाल 
थंड करून मानवतेच्या 
जंगलासाठी 
समानतेच्या जंगलासाठी  



©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------------------------------------------

27.



आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...! त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद..!!❤

 *** स्वरूप बदलले भाकरीची ***


एकट्याचा प्रवास करून युगाची 
साथ मिळविली 
शोषितांना तुफानाची वाट मिळाली 
बाबासाहेब दलितांचे दुःख 
तू केंद्रबिंदू केले 
अंगावर विद्येची श्रीमंती  
परिस्थितीवर मात करत
घराघरात शिक्षणाचा वारसा दिला 
फुललेल्या जीवनाला 
स्वावलंबी बनविले

आम्ही आता तक्रारी करत नाही 
दीक्षांतरानंतरचा सोहळा आता आमच्या बहिष्कृत जीवनाचा अभिमान आहे 
आता मी मुगजळामागे फिरत नाही 
आता कोणत्याही वाऱ्याला 
भीक घालत नाही  
दुःख यातना कुचंबना 
या सर्वातून बाहेर पडत आहोत 

हा फक्त आमचा 
जगण्याचा कर्मकांडाचा मार्ग नाही 
तर दीक्षा तर हा आमचा 
प्रकाशाचा दिवा होता 
अंधार भयमुक्त करणाऱ्या 
चेहऱ्यांचा तो आवाज होता 
नवीन सूर्योदयासोबत 
नवीन सूर्योदय होता 

बाबासाहेब,
वास्तव आता खूप वेगळे आहे दीक्षांतरामुळे अस्तित्व हरवलेल्या 
माणसाला अस्तित्व मिळवून 
देणाऱ्या त्या सोहळ्यानंतर 
दुःख दारिद्र व्यथा वेदना 
विद्रोह खूप झाला 
अग्नीची जाळपोळ खूप झाली. 
माणसाच्या गटांचे राजकारण खूप झाले 
म्हणून आम्ही हरिजन राहील नाही 
आम्ही बुद्ध झालो 
रक्तात पेटलेल्या आक्रोशाने 

तुम्ही झिजवलेल्या पायरांवर 
आता आमच्या रक्ताच्या शाईने 
तुमचे नाव लिहत आहोत 
वास्तवाची जाणीव अजूनही 
आमच्या मनात आहे 
दीक्षांतरानंतर नवे पर्व चालू झाले 
जगण्याचे तरीपण 
हुशार माणसे अजूनही कळपातच! 
आरक्षण तितकं त्यांच्या कागदावर आहे 
पेटलेला वनवा मात्र त्यांना दिसत नाही वर्णव्यवस्थेच्या चिखलात 
ते अजूनही घट्ट पाय रोवून आहे 

तुझा खांदा माझा खांदा 
माझं रक्त तुझं रक्त 
तुझे पाय माझे पाय 
तुझे हात माझे हात 
तुझी भाजी माझी भाजी 
तुझा अस्तित्व माझंच अस्तित्व 
अशा शब्दात बंदुकीच्या गोळ्या 
चालूच आहे तरीपण 
हा समाज चिखलात खोलपर्यंत 
तू रुजू दिला नाही 
ही हुंकार श्वासात आहे 
वंशवाद परंपरा जोहार 
यासारखा शब्दांना आता किंमत  
अजूनही आहे 
पण त्या शब्दात आक्रोश नाही 
ते आता सरळ साधे शांत 
झालेले शब्द आहेत 

दीक्षांतरानंतर शहर जागे झाले आहे 
गाव स्फोटक झाला आहे 
शाळेच्या भिंती अजूनही मातीच्याच आहे पानगळ झाल्यानंतर 
नवचैतन्याने फुललेल्या झाडासारखी 
ती अजूनही विद्यादान देतच आहे 
नवीन प्रयोगा सोबत 
आम्ही अजूनही चालतच आहोत 
अदलाबदल होते कधी 
बदललेल्या जगेबरोबर 
शाळेला नवीन शब्दांच्या 
गाभाऱ्यात नवीन पद्धतीने मांडली 
जाते पण ते दुबळे करीत नाही 

कारण तू शिकविले आम्हाला 
आमच्या क्रांतीचा वनवा 
त्या शाळेच्या प्रत्येक रस्त्यावर 
बाबासाहेब भेटतो 
कधी शिक्षकाच्या स्वरूपात 
तर कधी काळा फळावर पांढऱ्या 
खडूच्या शब्दांनी 
शब्द घडविले 
शब्द आमच्यापर्यंत आले 
बुद्ध आमच्यात पेरला 
मानवतेचा 
म्हणून रडत बसत नाही 
बाबासाहेब प्रत्येक पायवाट 
आमची आहे 
जातीयतेच्या नावावर 
दुःख खूप आहे 
संकटे खूप आहे तरी 
दीक्षांआरंभामुळे माणूस आहोत 
राक्षसाच्या छाताडावर जळलेली 
ही पानगळ आहे 

नवीन पालवीसाठी आणि ती पालवी 
ते वास्तव तो विद्रोह ती नवक्रांती 
तो प्रभावी आत्मविश्वास अभिव्यक्ती 
वैचारिक पार्श्वभूमी 
वेदनाची दाहकता कमी करून 
तुम्ही आम्हाला दिली 
दीक्षांत सोहळा मध्ये 
सामाजिक विद्रोहाला मानवतेच्या 
कसोटीत ठेवून मांडला 
आणि भाकरीचे स्वरूप बदलविले  
तूम्ही इतिहास बदलविला 
आयुष्याच्या प्रगती 
पुस्तकात ...!!


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------------------------------------------


29.


       संघर्षाच्या प्रवासात अन्याय अत्याचार शोषण यांच्या विरुद्ध धगधगणारा ज्वालामुखी शांत झाला तो म्हणजे दीक्षांत समारंभानंतर...!         बदलत्या जागतिकीकरणामध्ये माणसांचे विचार बदलले पण त्या विचारात बाबासाहेबांची शिकवण अजूनही टिकून आहे, याच पार्श्वभूमीवर ही कविता...!!💕
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका आढळल्यास नक्की सांगा त्या दुरुस्त केल्या जाते त्यावर संशोधन केल्या जाईल धन्यवाद

   *** चालत राहते ***
चालत रहा विचारांची 
शिदोरी घेऊन 
गोडवा हा शब्दात नसला तरी 
विचारात मात्र राहू दे 
विचार मनात बुद्धीत ठेव 
विचारांचा दीक्षांत 
समारंभानंतर 

इतिहास साक्ष आहे 
तुझ्या कष्टांच्या भिजलेला क्षणांचा 
विचारांचे बीज पेरले 
घाव सोसून 
पावसात उन्हात आणि दुष्काळात 
व्यापक जीवन जगण्यासाठी 

भेटलेली मला सर्वच पायवाटा 
तुझ्या आहे तुझ्या विचारांचा आहे 
तुझ्या शब्दांच्या अंतापर्यंत आहे 
आत्मभान हरपून गाणारा महामानव 
आहेस, 
सुजलाम - सुफलाम 
बहुजन हिताय बहुजन सुखाय 
त्यासाठी जगणारा 
महामानव आहेस 

वर्णचा रंग कोणताही असो 
विषमतेच्या विषवेलीवर 
बुद्धांच्या विचारांचा गालिचा आहे 
दीक्षांत समारंभानंतर 
जीवन रूढीवादी परंपरेतून 
मुक्त आहे म्हणून चालत राहतो 
विचारांची शिदोरी घेऊन 
गोड शब्दात कधी तिखट शब्दात

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------------------------------------------











मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...