savitalote2021@bolgger.com
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१
माझी मर्यादा
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१
*** वेदना मनसोक्त ***
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१
*** शृंगार माझा ***
** गुरफटलेली मी **
*** भीम माझा आहे ***
** जय भीम **
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१
** युद्ध झाले अनेक **
सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१
* केले एकच युद्ध ***
रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१
विद्यार्थी दिवस इतिहास बदलविणारे वटवृक्ष
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१
आयुष्य एक प्रवास
आयुष्यातील प्रवास नवीन नवीन अनुभव घेऊन येत असतात. म्हणूनच आयुष्याचा प्रवास करताना मनमोकळ्या पद्धतीने करा. त्यात कोणतेही हेवेदावे करू नका... ठेवू नका..!! आयुष्याच्या प्रवासात कमी-जास्त होत राहील पण सर्वांना सर्व मिळते असे नाही.
माझ्याकडे आहे म्हणून गर्व करू नका त्याच्याकडे नाही म्हणून तोंडात येईल ते बोलू नका. कारण आयुष्याचा प्रवास प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो. कुणाच्या वाटेला तो खडतर येतो तर कोणाच्या वाटेला तो मऊ गुलाबी पाकळ्यांच्या पायवाटेसारखा येतो. ज्यांच्या वाटेला हा प्रवास आला असेल त्यांनी ते क्षण जपून साठवून ठेवा!! कारण हा प्रवास आपल्या मर्जीने होत नाही. कधी दुःखाचे सावट येईल माहित नाही म्हणून या आयुष्याच्या प्रवासाच्या या क्षणांना हृदयाच्या अतिआत अंतर्मनात जपून ठेवा.
आयुष्याच्या प्रवासाचे पुस्तक वाचता येत नाही लिहिता येत नाही फक्त ते जगावे लागते कारण प्रवास चालू असतो.
आयुष्य प्रवास असंख्या स्वप्नांपासून चालू होतो आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपड व्यक्तीची आयुष्यभर चालू होते कधी आयुष्य स्तब्ध करून जाते. तर कधी आयुष्य खूप मनमोकळ्या गप्पा मारीत बसते.खूप आनंदी होते. खूप दुःखी होते. नकळत आयुष्य प्रवास या दोन गोष्टीवर चालत राहते.
मनातल्या मनाला कधीच या प्रवासात समजून घेत नाही.... समजत नाही... समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण तो फक्त आपला प्रवास करीत असतो. मात्र सोबत दुःख सोबत आनंद सोबत सुख सोबत अगणित स्वप्नांची मनसाखळी त्यांच्या या प्रवासाचे गणित मीटरमध्ये लागू शकत नाही हा प्रवास जितका सोयीचा आणि मन पूरक होईल याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. शेवटी प्रवासा हा शेवटचा टप्पा तर येणारच.
आयुष्य एक प्रवास जन्मापासून चालू झालेला. आपल्याला फक्त चालू होण्याचा मार्ग माहित आहे. आपल्याही नकळत चालू होणारा आईच्या गर्भात पण शेवटचा टप्पा क्षण वेळ प्रसंग आणि त्या पर्यंत नेणाऱ्या प्रवासाची कार्यपद्धती नियम माहित नाही.... म्हणून प्रवास चालू ठेवा. कोणतेही हेवेदावे न करता शेवटी आयुष्य प्रवास एकाच वाटेवर संपतो आयुष्यात कितीही वेगवेगळी वळणे व्यक्तीच्या जीवनात असली तरी आयुष्याच्या प्रवास पुस्तकात शेवटचे पान एकच असते.
निसर्ग सत्य आहे ज्या गोष्टीची सुरुवात झाली ती गोष्ट शेवटच्या क्षणांपर्यंत जाणार. "शेवटी हे आयुष्य प्रवास आहे ".
आयुष्य एकाच संपलेल्या प्रवासापर्यंत घेऊन जाते. ते आयुष्याचे शेवटचे पान कोणताही व्यक्ती लिहू शकत नाही.... पाहू शकत नाही आणि कुणी विचारही करू शकत नाही. आयुष्य प्रवास अंतिम टप्पा गाठलेला असतो सुखदुःखाच्या वाटेवर यश अपयशाच्या नावेवर गर्व अहंकार या तलवारीवर आणि आपुलकी जिव्हाळा या मायेच्या सुंदर ओंजळीमध्ये सत्य-असत्य च्या पलीकडे आयुष्य एक प्रवास चालू राहतो.
आपण असलो वा नसलो तरी आयुष्य प्रवास खूप सुंदर एक कोड आहे. ते सोडविता ही येत नाही आणि कानाडोळा करता येत नाही. आयुष्य फक्त चालू असते. ते हसत घालवा कि रडत आयुष्य खूप सुंदर आहे.
आयुष्य प्रवास आहे म्हणून व्यक्ती आहे माणूस आहे. आठवणी आहे... श्वास आहे.... आपले व्यक्तिमत्व आहे.... आपली नीतिमत्ता आहे ...आपले मूल्य आहे... आपले संस्कार आहे... आपले सर्व नातीगोती आहे.... आपण आहो म्हणून सर्व आहे आणि आपण आहो म्हणून आयुष्याचा प्रवास आहे.
आयुष्य अनुभवाचे गाव
आयुष्य मिळालेले अमूल्य क्षण
आयुष्य भरभरून देणारे व घेणारे
आयुष्य स्वप्नांना जागविणारे
आयुष्य दुःखाची माळ सुखाची फुलछडी
आयुष्यात ठिगळ गोधडीचे
आणि गालीचा हसूचा
आयुष्य प्रवास शेवटचा क्षणपावलांचा
चोरपावलांनी न माहीत असलेला
प्रवास क्षणी...
आयुष्य प्रवास एक गणित
माझे तुमच्यातील न उलगडलेले
एक भूमितीय प्रमेय
निसर्ग नियमांमध्ये बांधले
तरी खूप सुंदर ..!!
सकाळच्या गारवासारखे
आयुष्य एक प्रवास संपलेल्या
क्षणापर्यंत माझा माझ्यासाठी
चालू झालेला
रात्र दिवसाच्या खेळासारखा...!!!!
आयुष्य प्रवास कधी ही संपत नाही. तो इतरांच्या आयुष्यात आठवणींच्या स्वरूपात त्यांच्या आयुष्य प्रवासात सोबत राहतो.
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१
*** धडपड ***
माझ्या जखमा..!
** अबोल ***
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१
** संपलेल्या क्षणानंतर प्रवास **
शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१
हळवी आठवण
** सावली मैत्रीत **
शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१
** शृंगार माझा **
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१
बाबासाहेब
** बाबासाहेब **
मानवाला मानव म्हणून जगण्याची
जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती
घडवून आणली ज्ञानाची ज्योत पेटवून
असमानतेच्या विचारात पेरले
नव विकासाचे बीज
ज्ञानाच्या जोरावर क्रांतीचे वादळ
घडवून आणले संघर्षावर मात करीत
अखंड दिवाचा प्रकाश
संपूर्ण जगाला दाखवून दिला
ज्ञानाच्या भरारीने
विकासाचा तळपता सूर्य ठरला
घडवून आणली
एकही थेंब न सांडविता धम्मक्रांती
रूढी प्रथेच्या नावावर
अंधश्रद्धेच्या महापुरात
धर्मांतराने घडविला इतिहास
संघर्षाला मात केली
प्रज्ञा शील करुणा मैत्री तत्त्वाने
विचारांचे परिवर्तन घडवून
नवपेरणी केलीस बुद्ध विचाराने
गंजलेल्या शोषित विचारांमधील
गुलाम मोकळा झाला धर्मांतराने
ज्ञानाच्या जोरावर
समानतेच्या जोरावर
संविधानाच्या जोरावर..!!!
मासिक बाई पण
*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात आधार फक्त वेदनेचाच असतो पूर्णत्वाच्या विचाराने बाईपण जगत असते वेदनेचा काय घेऊन बसले मासिक धर्म...
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार एक क्रांती... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्व अनेक पैलूने व्याप...
-
दीक्षा (काव्यसंग्रह) "एक आरंभ नव युगाचा" Deeksha " A beginning of the New Age" काव्यसंग्रह शीर्षक :- द...
-
** डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मांतंर ** भारतामध्ये अनेक महापुरुषांनी ...